शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली काढणार

By admin | Updated: July 3, 2016 01:42 IST

गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पोलीस वसाहतींची परिस्थिती खराब आहे. त्यांच्यासाठी नवीन वसाहती निर्माण करणे गरजेचे आहे.

गृहराज्यमंत्री शिंदे : डुग्गीपारच्या इमारतीचे लोकार्पणसडक-अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पोलीस वसाहतींची परिस्थिती खराब आहे. त्यांच्यासाठी नवीन वसाहती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारकडून निधी मिळवून देऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.इंग्रजीच्या काळापासून असलेल्या डुग्गीपार पोलीस ठाण्याची इमारत जुनी झाल्यामुळे नवीन इमारतीची गरज लक्षात घेता नवीन इमारती बांधकाम करण्यात आले. त्याचे लोकार्पण शनिवारी झाले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, आ. विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, माजी आ.हेमंत पटले, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक-अर्जुनी पं.स.च्या सभापती कविता रंगारी, कोहमाराचे सरपंच माया उईके, सडक-अर्जुनीच्या न.पं.अध्यक्ष सरीता लांजेवार, तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप झळके आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलीस मित्र उपस्थित होते. यावेळी पोलीस मित्र व पोलीस पाटील यांची कार्यशाळाही घेण्यात आली. मंत्र्याच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस मित्र व पोलीस पाटलांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गोंदिया जिल्हा पूर्णपणे मोबाईल रेंजमध्ये जाणला जाईल. आदिवासी दुर्गम भागात मोबाईल रेंज राहत नसल्यामुळे माणूस माणसापासून दूर होत आहे. पोलिसाच्या शहीद कुटूंबाना भरभरून मदत केली जाईल. महिलांना पोलीस ठाणे हे त्यांचे माहेर वाटले पाहिजे, पोलीसाबद्दलची भिती दूर करा असे सांगून प्रत्येक ठाण्यात स्वागत कक्ष उभारण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्यामुळे बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टरांवर काम भागवावे लागत असल्याचे ते म्हणाले.अध्यक्षीय भाषणात ना.बडोले म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात निसर्ग नटला आहे. मालगुजार तलाव आहेत, शेती चांगली आहे पण सुशिक्षीत बेरोजगारांना काम नाही, जिल्ह्यात अदानीशिवाय दुसरा मोठा प्रकल्प नाही, नवीन प्रकल्प उभारून रोजगाराची संधी उपलब्ध करू असे ते म्हणाले. प्रास्ताविक पो.अधीक्षक भुजबळ यांनी केले.