शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

धान वाहतुकीच्या नावावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 22:12 IST

आदिवासी विकास महांमडळातंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी पाठविले जाते. मात्र राईसमिलपर्यंत धान पोहचविण्याच्या वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत असून लूट केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते रोशन बडोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळ : शासनाची दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : आदिवासी विकास महांमडळातंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी पाठविले जाते. मात्र राईसमिलपर्यंत धान पोहचविण्याच्या वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत असून लूट केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते रोशन बडोले यांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांजवळील धान केंद्र सरकारची नोडल एजंसी म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी विभागात धान्य खरेदी करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळ नाशिक मार्फत केले जाते. बिगर आदिवासी विभागात धान खरेदीचे काम जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत केले जाते. आदिवासी विभागात प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय भंडारा येथे आहे. या कार्यालयामार्फत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भागात देवरी तालुक्यात एकूण १८ धान खरेदी केंद्र, सालेकसा ६, अर्जुनी-मोरगाव ६ सडक-अर्जुनी तालुक्यात १० धान्य खरेदी केंद्र आहेत. खरीप पणन हंगाम २०१७-१८ करीता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत खरेदी होणाºया धानाची भरडाई खरेदीसह सुरु करणे आवश्यक आहे. अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने २४ नोव्हेंबर २०१७ ला परिपत्रक काढून धानाची भरडाई ही अभिकर्ता संस्थेची राहील व जिल्ह्यात भरडाईसाठी जिल्हा समन्वय समिती करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. मार्केटिंग फेडरेशन आदिवासी विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदस्य सचिव असतात. खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईच्या अनुषंगाने अभिकर्ता संस्थेस मदत करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वय समितीची असते. जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७ लाख १८ हजार ८४९ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दोन लाख ९४ हजार ६१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. शासनाकडे राईल मिल नसल्यामुळे जिल्ह्यातील जवळपाळ ८१ राईस मिलर्सनी धान्य भरडाईसाठी करारनामा केला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार एक क्विंटल धान भरडाईतून कमीत कमी ६७ किलो तांदूळ जमा करायचा असतो. शासन भरडाई क्षमता व वाहतुकीच्या अंतरानुसार प्रामुख्याने विचार करावा असे निर्देश असतानासुध्दा प्रादेशिक व्यवस्थापक भंडारा हे शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे. त्या तालुक्यातील जवळील राईस मिलांना भरडाईचे काम न देता बाहेरच्या तालुक्यातील राईस मिलांना भरडाईचे काम दिले जाते. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत असून शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन वाहतुकीचा अतिरिक्त खर्च सबंधित अधिकाºयांकडून वसूल करण्यात यावा, अशी तक्रार अन्न पुरवठा सचिव पाठक यांच्याकडे रोशन बडोले यांनी केली आहे. तसेच याची दखल न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.