शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

धान वाहतुकीच्या नावावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 22:12 IST

आदिवासी विकास महांमडळातंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी पाठविले जाते. मात्र राईसमिलपर्यंत धान पोहचविण्याच्या वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत असून लूट केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते रोशन बडोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळ : शासनाची दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : आदिवासी विकास महांमडळातंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी पाठविले जाते. मात्र राईसमिलपर्यंत धान पोहचविण्याच्या वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत असून लूट केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते रोशन बडोले यांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांजवळील धान केंद्र सरकारची नोडल एजंसी म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी विभागात धान्य खरेदी करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळ नाशिक मार्फत केले जाते. बिगर आदिवासी विभागात धान खरेदीचे काम जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत केले जाते. आदिवासी विभागात प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय भंडारा येथे आहे. या कार्यालयामार्फत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भागात देवरी तालुक्यात एकूण १८ धान खरेदी केंद्र, सालेकसा ६, अर्जुनी-मोरगाव ६ सडक-अर्जुनी तालुक्यात १० धान्य खरेदी केंद्र आहेत. खरीप पणन हंगाम २०१७-१८ करीता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत खरेदी होणाºया धानाची भरडाई खरेदीसह सुरु करणे आवश्यक आहे. अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने २४ नोव्हेंबर २०१७ ला परिपत्रक काढून धानाची भरडाई ही अभिकर्ता संस्थेची राहील व जिल्ह्यात भरडाईसाठी जिल्हा समन्वय समिती करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. मार्केटिंग फेडरेशन आदिवासी विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदस्य सचिव असतात. खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईच्या अनुषंगाने अभिकर्ता संस्थेस मदत करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वय समितीची असते. जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७ लाख १८ हजार ८४९ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दोन लाख ९४ हजार ६१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. शासनाकडे राईल मिल नसल्यामुळे जिल्ह्यातील जवळपाळ ८१ राईस मिलर्सनी धान्य भरडाईसाठी करारनामा केला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार एक क्विंटल धान भरडाईतून कमीत कमी ६७ किलो तांदूळ जमा करायचा असतो. शासन भरडाई क्षमता व वाहतुकीच्या अंतरानुसार प्रामुख्याने विचार करावा असे निर्देश असतानासुध्दा प्रादेशिक व्यवस्थापक भंडारा हे शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे. त्या तालुक्यातील जवळील राईस मिलांना भरडाईचे काम न देता बाहेरच्या तालुक्यातील राईस मिलांना भरडाईचे काम दिले जाते. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत असून शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन वाहतुकीचा अतिरिक्त खर्च सबंधित अधिकाºयांकडून वसूल करण्यात यावा, अशी तक्रार अन्न पुरवठा सचिव पाठक यांच्याकडे रोशन बडोले यांनी केली आहे. तसेच याची दखल न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.