शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

वृक्षारोपणाच्या उद्दिष्टाने ग्रामपंचायतीसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:04 IST

गोंदिया जिल्हा परिषदतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतींना ३२०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लहान गावच्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च कसा व कोणत्या निधीतून करायचा हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. दरम्यान या प्रश्नावर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर जि.प.मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

ठळक मुद्देनिधी खर्च कुठून करायचा : जिल्हा परिषद सदस्य करणार मुकाअशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्हा परिषदतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतींना ३२०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लहान गावच्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च कसा व कोणत्या निधीतून करायचा हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. दरम्यान या प्रश्नावर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर जि.प.मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.महाराष्टÑ शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत १ जुलै रोजी वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात मागील चार वर्षापासून ही मोहीम राबविण्यात येत असल्यामुळे बहुतांशी गावात जागाच शिल्लक नाही. अशाप्रसंगी देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण कसे करायचे हा मोठा पेच ग्रामपंचायतींसमोर निर्माण झाला आहे.काही ग्रामपंचायतींजवळ परिचरांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत.अशावेळी कोणत्या निधीतून खर्च करावा हा प्रश्न पडला आहे. शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायतींना मुळीच हरकरत नाही. मात्र अडचणी भरपूर आहेत. एकतर निधी उपलब्ध नाही.शिवाय हाताला रोजगार नसल्याने मजूर वर्ग उदरनिर्वाहासाठी इकडे तिकडे गेलेला आहे. अनेक गावात पाणी टंचाई आहे. ग्रा.पं.चा सामन्य फंड, तंटामुक्त गाव समितीचा निधी, पर्यावरण निधी व ग्रामनिधीतून हा खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र बºयाचशा ग्रा.पं.मधील हा निधी पूर्वीच खर्च झालेला आहे. मग्रारोहयो योजनेतून अंदाजपत्रक तयार करण्याचे सुचविण्यात आले. मात्र सेक्यूअर सॉफ्टवेअरमध्ये अद्याप अंदाजपत्रक तयार होऊ शकले नाही.तांत्रिक कृषी सहायकांना या सॉफ्टवेअरचे अद्यावत ज्ञान नसल्याने या योजनेतून खर्च करण्यासाठी इस्टिमेट तयार झाले नाहीत. या सर्व तांत्रिक बाबींमुळे ग्रामपंचायतीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतना देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होते किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.