शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वृक्षारोपणाच्या उद्दिष्टाने ग्रामपंचायतीसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:04 IST

गोंदिया जिल्हा परिषदतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतींना ३२०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लहान गावच्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च कसा व कोणत्या निधीतून करायचा हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. दरम्यान या प्रश्नावर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर जि.प.मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

ठळक मुद्देनिधी खर्च कुठून करायचा : जिल्हा परिषद सदस्य करणार मुकाअशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्हा परिषदतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतींना ३२०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लहान गावच्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च कसा व कोणत्या निधीतून करायचा हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. दरम्यान या प्रश्नावर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर जि.प.मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.महाराष्टÑ शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत १ जुलै रोजी वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात मागील चार वर्षापासून ही मोहीम राबविण्यात येत असल्यामुळे बहुतांशी गावात जागाच शिल्लक नाही. अशाप्रसंगी देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण कसे करायचे हा मोठा पेच ग्रामपंचायतींसमोर निर्माण झाला आहे.काही ग्रामपंचायतींजवळ परिचरांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत.अशावेळी कोणत्या निधीतून खर्च करावा हा प्रश्न पडला आहे. शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायतींना मुळीच हरकरत नाही. मात्र अडचणी भरपूर आहेत. एकतर निधी उपलब्ध नाही.शिवाय हाताला रोजगार नसल्याने मजूर वर्ग उदरनिर्वाहासाठी इकडे तिकडे गेलेला आहे. अनेक गावात पाणी टंचाई आहे. ग्रा.पं.चा सामन्य फंड, तंटामुक्त गाव समितीचा निधी, पर्यावरण निधी व ग्रामनिधीतून हा खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र बºयाचशा ग्रा.पं.मधील हा निधी पूर्वीच खर्च झालेला आहे. मग्रारोहयो योजनेतून अंदाजपत्रक तयार करण्याचे सुचविण्यात आले. मात्र सेक्यूअर सॉफ्टवेअरमध्ये अद्याप अंदाजपत्रक तयार होऊ शकले नाही.तांत्रिक कृषी सहायकांना या सॉफ्टवेअरचे अद्यावत ज्ञान नसल्याने या योजनेतून खर्च करण्यासाठी इस्टिमेट तयार झाले नाहीत. या सर्व तांत्रिक बाबींमुळे ग्रामपंचायतीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतना देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होते किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.