शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शेंडा ते सडक-अर्जुनी रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: January 17, 2015 23:01 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक/अर्जुनी या १४ किलोमीटर अंतर असलेल्या डांबरीकरण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.

शेंडा-कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक/अर्जुनी या १४ किलोमीटर अंतर असलेल्या डांबरीकरण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेल्या सा.बां. विभागाने या रस्त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. शेंडा ते सडक अर्जुनीचे अंतर १४ कि.मी. आहे. सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील लोकांना शासकीय कामानिमित्त याच मार्गाने प्रवास करावा लागतो तर उखडलेल्या रस्त्यामुळे १४ कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. यावरुन रस्त्याचे काय हाल झाले असतील याची कल्पना येते.जागोजागी रस्ता उखडला असून गिट्टी वर आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दररोज अपडाऊन करणारे छातीत दुखापत होते असे सांगत आहेत. त्याचप्रमाणे वाहन कुठे पंक्चर होईल याचा नेम नाही. याच रस्त्यावर अनेक जिवघेणे वळण आहेत. वळणावर गवताचे साम्राज्य पसरले आहे. समोरुन येणारी वाहने एकमेकांना दिसत नसल्याने नेहमीच अपघात घडत आहेत. तरीही बांधकाम विभागाने कुठेही वाहने हळू चालवा, हॉर्न वाजवा, अथवा धोक्याचे वळण असे बोर्ड लावलेले नाही. त्याचप्रमाणे अपघाताच्या ठिकाणी ब्रेकर्स तयार केले नाही.मागील वर्षी याच मार्गावर दोन कि.मी. अंतराचे डांबरीकरण करण्यात आले होते. वापरात आणलेली गिट्टी पूर्णत: मातीमिश्रित होती. डांबराचे वापर फारच कमी होता. त्यामुळे रस्ता सोबतच उखडायला लागला होता. ही बाब वृत्त पत्राच्या माध्यमातून सा.बा. विभागाला जागे करण्यात आले होते. परंतु आपसात सोटेलोटे असल्याने त्या कंत्राटदारावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.रस्त्यावर खड्डे पडले की गिट्टी टाकून थूकपॉलीस करुन त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो व आठवडा लोटला की रस्त्याची दशा ‘जैसे थे’ होते, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सध्या शेंडा ते सडक अर्जुनी मार्गाची दुर्दशा झाली आहे. सततच्या रहदारीमुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे हा मार्ग पक्का व मजबूत होणे गरजेचे आहे. केवळ नागरिकांची ओरड म्हणून थूक पॉलीस करु नये, शासनाचे पैसे स्वत:च्या घशात न टाकता लोकपयोगी कामाकरताच लावून या रस्त्याला कायमस्वरुपी चांगले करावे, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)