शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेंडा ते सडक-अर्जुनी रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: January 17, 2015 23:01 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक/अर्जुनी या १४ किलोमीटर अंतर असलेल्या डांबरीकरण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.

शेंडा-कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक/अर्जुनी या १४ किलोमीटर अंतर असलेल्या डांबरीकरण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेल्या सा.बां. विभागाने या रस्त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. शेंडा ते सडक अर्जुनीचे अंतर १४ कि.मी. आहे. सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील लोकांना शासकीय कामानिमित्त याच मार्गाने प्रवास करावा लागतो तर उखडलेल्या रस्त्यामुळे १४ कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. यावरुन रस्त्याचे काय हाल झाले असतील याची कल्पना येते.जागोजागी रस्ता उखडला असून गिट्टी वर आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दररोज अपडाऊन करणारे छातीत दुखापत होते असे सांगत आहेत. त्याचप्रमाणे वाहन कुठे पंक्चर होईल याचा नेम नाही. याच रस्त्यावर अनेक जिवघेणे वळण आहेत. वळणावर गवताचे साम्राज्य पसरले आहे. समोरुन येणारी वाहने एकमेकांना दिसत नसल्याने नेहमीच अपघात घडत आहेत. तरीही बांधकाम विभागाने कुठेही वाहने हळू चालवा, हॉर्न वाजवा, अथवा धोक्याचे वळण असे बोर्ड लावलेले नाही. त्याचप्रमाणे अपघाताच्या ठिकाणी ब्रेकर्स तयार केले नाही.मागील वर्षी याच मार्गावर दोन कि.मी. अंतराचे डांबरीकरण करण्यात आले होते. वापरात आणलेली गिट्टी पूर्णत: मातीमिश्रित होती. डांबराचे वापर फारच कमी होता. त्यामुळे रस्ता सोबतच उखडायला लागला होता. ही बाब वृत्त पत्राच्या माध्यमातून सा.बा. विभागाला जागे करण्यात आले होते. परंतु आपसात सोटेलोटे असल्याने त्या कंत्राटदारावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.रस्त्यावर खड्डे पडले की गिट्टी टाकून थूकपॉलीस करुन त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो व आठवडा लोटला की रस्त्याची दशा ‘जैसे थे’ होते, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सध्या शेंडा ते सडक अर्जुनी मार्गाची दुर्दशा झाली आहे. सततच्या रहदारीमुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे हा मार्ग पक्का व मजबूत होणे गरजेचे आहे. केवळ नागरिकांची ओरड म्हणून थूक पॉलीस करु नये, शासनाचे पैसे स्वत:च्या घशात न टाकता लोकपयोगी कामाकरताच लावून या रस्त्याला कायमस्वरुपी चांगले करावे, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)