शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

शेंडा ते सडक-अर्जुनी रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: January 17, 2015 23:01 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक/अर्जुनी या १४ किलोमीटर अंतर असलेल्या डांबरीकरण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.

शेंडा-कोयलारी : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक/अर्जुनी या १४ किलोमीटर अंतर असलेल्या डांबरीकरण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेल्या सा.बां. विभागाने या रस्त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. शेंडा ते सडक अर्जुनीचे अंतर १४ कि.मी. आहे. सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील लोकांना शासकीय कामानिमित्त याच मार्गाने प्रवास करावा लागतो तर उखडलेल्या रस्त्यामुळे १४ कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. यावरुन रस्त्याचे काय हाल झाले असतील याची कल्पना येते.जागोजागी रस्ता उखडला असून गिट्टी वर आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दररोज अपडाऊन करणारे छातीत दुखापत होते असे सांगत आहेत. त्याचप्रमाणे वाहन कुठे पंक्चर होईल याचा नेम नाही. याच रस्त्यावर अनेक जिवघेणे वळण आहेत. वळणावर गवताचे साम्राज्य पसरले आहे. समोरुन येणारी वाहने एकमेकांना दिसत नसल्याने नेहमीच अपघात घडत आहेत. तरीही बांधकाम विभागाने कुठेही वाहने हळू चालवा, हॉर्न वाजवा, अथवा धोक्याचे वळण असे बोर्ड लावलेले नाही. त्याचप्रमाणे अपघाताच्या ठिकाणी ब्रेकर्स तयार केले नाही.मागील वर्षी याच मार्गावर दोन कि.मी. अंतराचे डांबरीकरण करण्यात आले होते. वापरात आणलेली गिट्टी पूर्णत: मातीमिश्रित होती. डांबराचे वापर फारच कमी होता. त्यामुळे रस्ता सोबतच उखडायला लागला होता. ही बाब वृत्त पत्राच्या माध्यमातून सा.बा. विभागाला जागे करण्यात आले होते. परंतु आपसात सोटेलोटे असल्याने त्या कंत्राटदारावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.रस्त्यावर खड्डे पडले की गिट्टी टाकून थूकपॉलीस करुन त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो व आठवडा लोटला की रस्त्याची दशा ‘जैसे थे’ होते, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सध्या शेंडा ते सडक अर्जुनी मार्गाची दुर्दशा झाली आहे. सततच्या रहदारीमुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे हा मार्ग पक्का व मजबूत होणे गरजेचे आहे. केवळ नागरिकांची ओरड म्हणून थूक पॉलीस करु नये, शासनाचे पैसे स्वत:च्या घशात न टाकता लोकपयोगी कामाकरताच लावून या रस्त्याला कायमस्वरुपी चांगले करावे, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)