शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मालीपार येथील तलावांची दुर्दशा

By admin | Updated: October 4, 2014 23:29 IST

जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत येत असलेल्या मालीपार येथील तलावाची डव्वा येथील आस्वली तलावाची व पाटबंधारे विभागामार्फ त असलेल्या टेकेपार डोडमाझरी येथील राजडोह

धान पीक धोक्यात : शेतकरी संकटातआमगाव (दिघोरी) : जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत येत असलेल्या मालीपार येथील तलावाची डव्वा येथील आस्वली तलावाची व पाटबंधारे विभागामार्फ त असलेल्या टेकेपार डोडमाझरी येथील राजडोह तलावाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. जि.प. अंतर्गत असलेल्या तलावाची व नहराची डागडुजी मागील अनेक वर्षांपासून झाली नसल्याने नहराची नासधूस झाली आहे. पर्यायाने तलावाचा पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही. एकेकाळी या तलावामुळे सर्वंच शेतीला पाणी पुरत होते मात्र आता नहराची देखभाल न केल्यामुळे नहरातील पाणी पुढे सरकत नाही. शेतकऱ्यांनी नहराची स्वत: दुरूस्ती करून शेतीला पाणी द्यावे, असे शेतकऱ्याला अधिकारी सांगतात. मालीपार तलावाचे पाणी चांदोरी येथील शेतकऱ्यांना मिळत होते; मात्र नहराची पूर्ण वाट लागल्याने पाणी येत नाही. डव्वा येथील तलावाचे नहर झुडपांनी बुजले असून या नहराने पाणी कसे करावे हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या तलावाचे पाणी २५० एकर शेतीला होत असते. पावसाने दडी मारल्याने धानपिके धोक्यात आले असून पिकांसाठी पाण्याची नितांत गरज आहे. पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या टेकेपार, डोडमाझरी येथील तलावाच्या नहराचे काम एका खासगी कंत्राटामार्फत करण्यात आले; मात्र ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ज्या ठिकाणी नहराचे काम करण्यात आले त्या ठिकाणाहून पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे टेकेपारकडे नहराला पाणी येत नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला व पाणी वाटप अध्यक्षाला जाब विचारला मात्र कामाबाबत पाणीवाटप संस्थेच्या अध्यक्षाला कोणत्याच प्रकारची माहिती नाही. पक्का बांधकामाचे पैसे उचलले. मात्र कच्चे काम केल्याचा आरोप टेकेपार येथील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीचे धोरण शासन आखत आहे. मात्र अधिकारी बेजबाबदारपणे कार्य करीत असल्याने शेतकऱ्यांना अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)