शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पहिल्या लाटेत भरघोस मदत; दुसऱ्या लाटेत मदत करणारेच गायब ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

गोंदिया : मागील वर्षी कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना खायला काही नाही म्हणून केंद्र शासनापासून तर गावातील ग्रामपंचायतीनेदेखील ...

गोंदिया : मागील वर्षी कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना खायला काही नाही म्हणून केंद्र शासनापासून तर गावातील ग्रामपंचायतीनेदेखील फूल नव्हे, तर फुलाची पाकळी म्हणून मदत केली. सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व समाजातील धनाढ्य व्यक्तींनी गोरगरिबांना, गरजूंना, विधवा, परित्यक्ता यांना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, गव्हाचे पीठ, सोयाबीन वळी, चना डाळ, तूरडाळ, हरभरा अशा विविध वस्तू गोरगरिबांना वाटप केल्या. जणू हे वाटप करण्याची पैजच लागली असावी असे चित्र होते.

मागच्या वर्षी लाॅकडाऊन सुरू झाले तेव्हा गोरगरिबांनी पैसे कमविले तेव्हा त्यांच्याजवळ पैसेही होते तरीही त्यांना मदत करण्यात आली होती; परंतु यंदा कोरोनामुळे कुणाकडे पैसे नसताना गोरगरिबांना या कोरोनाचा संकटाचा सामना करताना पोटाचा प्रश्न आड येत आहे. अशात महाराष्ट्र सरकारने तुटपुंजी मदत करण्याची घोषणा केली; परंतु ही मदत तोकड्या लोकांनाच मिळणार आहे. उर्वरित गोरगरिबांच्या मदतीसाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता दोन वेळच्या जेवनाची समस्या भेडसावत आहे. एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे पोटाचा प्रश्न भेडसावत आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करून फोटो प्रकाशित करणाऱ्यांनी यंदा का मदतीसाठी हात पुढे केला नाही. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य आताही त्यांच्याकडून संपले नसावेत असा तर धान्य देणारे विचार करीत नाही ना, असा सवाल उपिस्थत होत आहे.

..............

बॉक्स

मदतीला फॅड बनवू नका

एखाद्या नेत्याने आवाहन जर केले तरच आपण गोरगरिबांना मदत करू, असा गोड गैरसमज समाजात निर्माण झालेला दिसतो. मागच्या वर्षी देशातील बड्या नेत्यांच्या आवाहनावरून उद्योजकांपासून तर गावखेड्यांतील लोकांनी आपापल्या परीने मदत केली; परंतु यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. मागच्या वर्षी फक्त माध्यमांमध्ये आपला फोटो छापून येईल म्हणून मदत वाटप केली की काय? मदत करण्याचा एक फॅड त्यावेळी तयार झाला होता. मग आता गोरगरिबांना मदत कोण करणार, दानदाते आपला मदतीचा हात पुढे करतील का, असा सवाल होत आहे. कोरोनामुळे गोरगरिबांना दोनवेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे.