शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे सुखद आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 00:50 IST

आषाढी पौर्णिमा संपताच कृष्ण पक्षाच्या आगमनासह पावसाचेही सुखद आगमन झालेले आहे. पहाटे पासून पावसाने मध्यमगतीने सुरुवात केली असून ..

बळीराजा आनंदीत : तालुक्यात शेतीच्या कामाला वेग लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आषाढी पौर्णिमा संपताच कृष्ण पक्षाच्या आगमनासह पावसाचेही सुखद आगमन झालेले आहे. पहाटे पासून पावसाने मध्यमगतीने सुरुवात केली असून शेती शिवारात सर्वत्र पावसाची हजेरी लागली त्यामुळे शेतात कामाला वेग आला आहे. आतापर्यंत खऱ्या अर्थाने दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती. पौर्णिमेच्या वेळी भरती ओहटीचा जोर वाढल्याने मान्सून प्रवाहाला सुध्दा वेग वाढतो. सध्या अरबी समुद्रात भरती ओहटी वाढली असून या प्रभाव वाढू लागला आहे. यामुळे मान्सून सुध्दा पुढे जाण्यास सक्षम झाला आहे. यापूर्वी पाऊस काही मोजक्या ठिकाणी पडत होता. कारण की, त्याला चालना देणारी परिस्थीती निर्माण होत नव्हती. त्यामुळे सर्वत्र मान्सूननी ढग वाहत नव्हते. मात्र आता मान्सूनी ढग निर्माण होत असून पुढील १५ दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमावस्येच्या काळात भरपूर पाऊस पडेल आणि शेतीची कामे सहज पूर्ण होण्यासाठी मदत मिळेल. १० जुलैला श्रावण मास सुरु झाला असून श्रावण महिना पाऊस पाडणारा महिना मानला जातो. याच महिन्यात शेतीची कामे करण्यासाठी उत्तम काळ असतो. त्यामुळे आता पावसाचे आगमन झाले असून शेती कामाला वेग येईल. सुरुवातीला पाऊस उशीरा आल्याने पेरणीची कामे मागे पडली. त्यामुळे थोड्या प्रमाणात रोवणीला उशीर झाल्यासारखे वाटू लागले. परंतु यापुढे पुरेशा पाऊस पडल्यास त्याची भरपाई होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांची पेरणी रखडली होती ती आता पूर्ण होईल. मात्र त्यांची रोवणी थोडी उशीरा चालेल. आतापर्यंत बोअरवेलधारक शेतकऱ्यांनी काही प्रमाणात रोवणीची कामे उरकून टाकली. बाकीची रोवणी लवकर आटोपण्यात मदत मिळेल. त्यामुळे मागे पडलेल्या शेतकऱ्यांना मनुष्यबळांचा व इतर साधनाचा लाभ घेऊन वेळेवर कामे करुन घेण्यास मदत मिळेल.उंदराचे आवाहन ठरले सार्थक मृग नक्षत्राचे वाहन मेंढा असून आद्रा नक्षत्रात कोल्हा वाहन असून पावसाने सवारी केली नाही. त्यामुळे दमदार पाऊस पडला नाही. आता पावसाच्या चौथ्या नक्षत्राला सुरुवात झाली असून या नक्षत्रात पावसाचे वाहन उंदीर असून कृष्ण पक्षासह नक्षत्रालाही सुरुवात झाली आहे. त्यावर उंदराचे आवाहन पावसाने स्वीकारले असून भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील दोन आठवडे सतत पाऊस येण्याचे संकेत असून अमावस्येपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. पुढच्या आठवड्यात अतिवृष्टी सुध्दा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार आता पावसाचे सुखद आगमन झाले असून शेतकरी आनंदीत झाला आहे.