शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातीच्या भूमीहिनांना १५० एकर जमीन देण्याचे नियोजन

By admin | Updated: August 13, 2016 00:11 IST

सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीय लोकांच्या सर्वांगिण विकासासाठी विभाग काम करते. मागास वर्र्गीयांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती व्हावी ...

विद्यार्थ्यांना सोयी देणार : समाजकल्याण सहा.आयुक्त मंगेश वानखडे नरेश रहिले गोंदिया सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीय लोकांच्या सर्वांगिण विकासासाठी विभाग काम करते. मागास वर्र्गीयांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती व्हावी याकरीता नेहमी विभाग प्रयत्नशील आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून ६ फेब्रुवारी २०१६ ला गोंदिया येथे रूजू झालो. सहा महिन्याच्या कालावधीत आमच्या विभागामार्फत शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दारिद्ररेषेखालील भूमिहीन अनुसूचित जातीच्या लोकांना कोरडवाहू ४ एकर व ओलीताची २ एकर जमीन देण्याचीही योजना या विभागामार्फत राबविण्यात येताच. या आर्थिक वर्षात १५० एकर जमीन वाटपाचे नियोजित करण्यात आले आहे. त्या संदर्भात देखील कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती विशेष समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखडे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीतून दिली आहे. ते म्हणाले, विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाच्या अत्यंत जीव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनामुळेच समाजातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्गीय, विशेष मागास प्रवर्गातील मुलांना शिक्षणाची सोय झाली. गोंदिया जिल्ह्यातील २८ हजार २६२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर महाविद्यालय स्तरावरील ३ हजार ९८८ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अर्जात तृट्या असल्यामुळे ते प्रलंबित आहेत. ज्या महाविद्यालयाकडे अर्ज प्रलंबित आहे त्या करीता सहाय्यक आयुक्त कार्यालयातील कर्मचारी पुन्हा महाविद्यालयात भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. जेणे करून शंभरटक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल हा आमचा माणस आहे. शाळांमध्ये मुलींची उपस्थित वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ५०८ विद्यार्र्थींनींना या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अनुसूचित जातीच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिनीट्रॅक्टर वाटप करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्यावर आहे. भटकंती करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ गोंदिया तालुक्याच्या अदासी तांडा येथील लोकांना देण्याची कार्यवाही सुरू आहे. या विभागामार्फत मुलींचे चार वसतीगृह आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यामध्ये ५० मुलींचे वसतीगृह मंजूर करण्यात आले. त्यात गोंदिया जिल्ह्यात चार वसतीगृह असून देवरी, गोंदिया व अर्जुनी-मोरगाव येथे वसतीगृह सुरू करण्यात आले. सडक-अर्जुनी येथील वसतीगृहासाठी भाड्याच्या इमारतीचा शोध घेणे सुरू आहे. इमारत मिळताच त्या ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यात येईल.जिल्ह्यात मुलींचे दोन जुने वसतीगृह सुरू आहेत. एक नवीन मंजूर करण्यात आले आहे. मुलांसाठी एक वसतीगृह असून या वसतीगृहांमध्ये १८४ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. वसतीगृहातील मुलांना राहणे, जेवण, पुस्तके, स्टेशनरी व इतर साहित्य पुरविले जात आहेत. इतर खर्चाकरीता येथील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ६०० रूपये तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ५०० रूपये निर्वाह भत्ता देण्यात येते. मुलांसाठी एक तर मुलींच्या दोन निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात ३५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची, गणवेश, पुस्तके अश्या सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील २७३ विद्यार्थ्यांना सैनिक व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची ओढ लागावी यासाठी जिल्हा ग्रंथालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यात ३०० विद्यार्थी या अभ्यासीकेचा लाभ घेत आहेत. शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे मुलाखतीतून विशेष समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखडे यांनी सांगितले.