शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

तलावाची जागाच विकून टाकली

By admin | Updated: September 5, 2015 02:20 IST

शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांध तलावातील जागाच विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बांध तलावावर भूमाफियांची वक्रदृष्टी : तलाव समिती लढण्यास सज्ज गोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांध तलावातील जागाच विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातून आता बांध तलावावरही भूमाफियांची वक्रदृष्टी दिसून येत असून या जागेचे एन.ए. (अकृषक) त्यांनी करून टाकले आहे. मात्र बांध तलावाला वाचविण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक डी.एस.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात बांध तलाव समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती बांध तलावाची जागा वाचविण्यासाठी आता संघर्ष करीत आहे. कुडवाच्या सीमेत येणारा मात्र सुर्याटोलाला लागून असलेला बांध तलाव लगतच्या विद्यानगर, केशवनगर, परमात्मा एक नगर, साई कॉलनी परिसरात दरवर्षी कहर करतो. यातूनच त्याची सिंचन क्षमता व क्षेत्राचा अंदाज लावता येतो. वास्तविक ढाकणी-खर्रा येथील जंगल व पहाडावरील पाणी वाहून या तलावात जमा होते व तलाव फुटल्यावर तलावाचे पाणी लगतच्या कॉलनीत शिरते. यावर तोडगा म्हणून शासनाकडून मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. नेमकी हीच बाब हेरून भूमाफियांचे बांध तलावाकडे लक्ष वळले असून आता त्यांनी तलावाचीच जागा विकून खाण्याचा धंदा सुरू केला आहे. विशेष म्हणजे या भूमाफियांनी तलावातील या जागेचे एनए करून टाकले आहे. तर आता त्या जागेवर कॉलनी वसविण्यासाठी प्लॉट्स पाडण्यात आले आहेत. येथे तलावाच्या जागेला एन.ए. कसे काय करण्यात आले हा मुख्य मुद्दा असून तलावाची जागा वाचविण्यासाठी बांध तलाव जिर्णोध्दार समितीचे गठन करण्यात आले आहे. तसेच सेवानिवृत्त शिक्षक सूर्यवंशी यांनीही यासाठी आंदोलन छेडले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून एन.ए. रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत मे महिन्यात उप विभागीय अधिकारी के.एन.के.राव यांनी तलावाचे निरीक्षण केले. मात्र त्यानंतरही जागेचे एन.ए. रद्द करण्यात आलेले नाही. प्राप्त माहितीनुसार, सुमारे १५० एकर जागेत बांध तलाव पसरले आहे. यातील सुमारे १०० एकर जागा खाजगी शेतीची असून काही शासनाचीही यात जागा आहे. तलावात पाणी राहत नाही त्यावेळी मालक त्या जागेवर शेती करू शकतो, मात्र पाणी राहिल्यास मालक त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. यामुळे काही जणांनी आपली जागा विकून टाकली आहे. ही जागा खरेदी करणाऱ्यांकडून या जागेवर कॉलनी तयार करण्याची योजना होती. मात्र बांध तलाव जिर्णोद्धार समितीने आडकाठी आणल्याने त्यांच्या कामात अडचण निर्माण झाली आहे. तर समिती आता जागेचे एन.ए.रद्द करण्यासाठी संघर्ष करीत आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचेही ध्यानाकर्षण करण्यात आल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)तलावात बोटींगची योजना या तलावाच्या सौंदर्यीक रणासाठी पूर्वी ५९ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. यातून तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तसेच अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. पाळ उंच व रूंद करण्यात आली. या पाळीचा उपयोग आता आवागमनासाठी होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तलावाच्या सौंदर्यीकरणाकडे जातीने लक्ष दिले व यासाठी त्यांनी ८९ लाख रूपयांचा निधी नावीन्यपूर्ण योजनेत मंजूर केला होता. यात तलावाच्या पाळीवर टाईल्स लावणे, तलावाच्या दोन्ही बाजूंना १५० मीटर पर्यंत दगडांचे पिचींग यासोबतच तीन फूट उंच सुरक्षाभिंत मंजूर करण्यात आली आहे. या जागेवर पायऱ्या तयार करण्यात येणार आहेत. यासाठी ७५ लाख रूपये मंजूर असून वर्क आॅर्डरची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते. ही सर्व कामे झाल्यावर नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने तलावात बोटींग सुरू करण्याची योजना आखली जात आहे.