शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

तलावाच्या नावे ‘मृत्यूचा खड्डा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 00:15 IST

तिरोडा तालुक्यात राज्यातील सर्वात मोठा विद्युत पॉवर प्लांट आल्यानंतर तिरोडा तालुकावासीयांनी आनंद व्यक्त केला.

चुरडी गावालगत तयार : पिचिंग व चढण्या-उतरण्याची व्यवस्था नाही लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : तिरोडा तालुक्यात राज्यातील सर्वात मोठा विद्युत पॉवर प्लांट आल्यानंतर तिरोडा तालुकावासीयांनी आनंद व्यक्त केला. नागरिकांनी खुल्या मनाने प्लांटला सहकार्य केले. कोणतीही अडचण निर्माण होवू दिली नाही. मात्र आता प्लांटचे संचालक व तेथील अधिकाऱ्यांच्या अयोग्य धोरण व कार्यामुळे तिरोडावासी संतापले आहेत. चुरडी गावालगतच गाव तलावाच्या नावे तयार करण्यात आलेल्या ‘मृत्यूच्या खड्ड्या’मुळे नागरिक चांगलाच रोष व्यक्त करीत आहेत. तिरोडा शहरालगत असलेल्या चुरडी गावाजवळ अदानी पॉवर फाऊंडेशनकडून १० ते १५ फूट खोलीचा गाव तलाव तयार करण्यात आला. हा तलाव नसून मृत्यूचा खड्डा असल्याचे नागरिक बोलतात. तलाव कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आला, हे समजण्यासारखे दिसत नाही. जनावरे व गावातील नागरिकांसाठी अनुपयोगी असल्याचे समजते. मात्र त्यामुळे जीव धोक्यात येवून कधीही जीवितहानी घडू शकते. पावसाळा सुरू झाला असून तलाव म्हणून भयंकर स्वरूपात खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या तळ्याला पिचिंग करण्यात आले नाही. चढण्या-उतरण्यासाठी कोणतेही साधन ठेवण्यात आले नाही. जनावरे, माणसे, मुले आदी तळ्यात गेले तर बाहेर निघणार कसे? त्यांचा जीव वाचेल कसा? याबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. या भागातील मृदा ही कन्हारी (चिकन) असल्याने त्यात घसरून फसण्याचेच प्रमाण अधिक आहे. एकदा तळ्यात गेलेला बालक, तरूण, वृद्ध किंवा जनावर परतणार नाही, त्याचे केवळ मृतदेहच बाहेर येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या ठिकाणी गाव तलाव तयार करण्यात आला, त्याला लागूनच १५ ते २० मीटर अंतरावर चुरडीच्या गरीब नागरिकांची घरे आहेत. या घरातील लहान मुलांसह जनावरांचे जीव चोवीस तास धोक्यात राहणार आहे. ग्रामपंचायत चुरडी व तालुका प्रशासनाने या बांधकामाची मंजुरी दिली कशी, ही आश्चर्याची बाब आहे. पावसाळ्याचा जोरदार पाऊस बरसण्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या या मृत्यूच्या खड्ड्याला (तलाव) चारही बाजूंनी सुरक्षा भिंत तयार करण्यात यावी. अन्यथा जनावरांसह माणसांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर कसलीही दुर्घटना घडली तर याची किंमत अदानी पॉवरला चुकविणे सहज होणार नाही, अशा इशारासुद्धा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. १२ एकर शेती बुडीत पॉवर प्लांट तयार होईपर्यंत नागरिकांना व शेतकऱ्यांना कसातरी दिलासा देण्यात आला. काम पूर्णत्वाकडे असताना लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचा विसर कंपनीला पडला आहे. चुरडी येथील उदाराम जांभूळकर यांची १२ एकर शेती असून अदानी पॉवरने वरच्या बाजूला नवीन पाण्याचा तलाव तयार केला. त्यामुळे या तलावाचे पाणी सतत शेतात झिरपत (सिपेज) असते. पिकांना सतत पाणी असल्याने उत्पन्नात घट येते. तसेच धान कापणीला आल्यास पाणी भरले असल्याने कापण्याची समस्या निर्माण होते. यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने जांभूळकर कुटुंबाला माजी आ. दिलीप बन्सोड यांनी ३० हजार रूपयांची आर्थिक भरपाई मिळवून दिली आहे. विकासाच्या नावे पिळवणूक अदानी फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या गावात तसेच पुनर्वसन केलेल्या गावात शासनासोबत केलेल्या करारनाम्यात विविध सुविधा आहेत. त्या सुविधा देण्यास अदानी फाऊंडेशन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विकास करण्याचे केवळ ढिंढोरे पिटले जात असून नागरिकांना सुविधा कमी तर सुविधेच्या नावावर अदानीचा पैसा हडप केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अधिकाऱ्यांना खूश ठेवून नागरिकांची मात्र पिळवणूक केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.