शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

ओवारा येथे पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

देवरी : तालुक्यातील महत्त्वपूर्ण ओवारा प्रकल्पातीलच नागरिक मागील एक महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करत असल्याची बाब समोर आली आहे. येथील ...

देवरी : तालुक्यातील महत्त्वपूर्ण ओवारा प्रकल्पातीलच नागरिक मागील एक महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करत असल्याची बाब समोर आली आहे. येथील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी भटकंती करून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याला ग्रामपंचायत प्रशासनच कारणीभूत असल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत.

तालुक्यातील ओवारा प्रकल्पातून देवरी व आमगाव तालुक्याला सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करण्यात येते; परंतु येथील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे स्थानिक नागरिकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील पाणीपुरवठा योजना मागील एक महिन्यापासून ठप्प पडली आहे. अधिकांश सार्वजनिक हातपंप नादुरुस्त असून, जे सुरू आहेत, त्यातून दूषित पाणी येत आहे, तसेच सार्वजनिक विहिरीचीही स्थिती बिकट असून, दुर्गंधीयुक्त, गढूळ व दूषित पाणी येते. ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांच्या दुर्लक्षपणामुळे गावात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. मागील एक महिन्यापासून गावात पाण्याची समस्या आहे. गावात पाणी शुद्धीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. गावातील नागरिकांना सतत गढूळ, अशुद्ध आणि आरोग्याला नुकसान करणारे पाणी पुरविण्यात येत असून, येथील पाणीपुरवठा एक महिन्यापासून बंदच आहे. ओवारा येथील पाण्याच्या समस्यांबाबत त्रस्त गावकऱ्यांनी यासंबंधी जिल्हाधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तक्रार केली आहे. तक्रारीत गावकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व समस्येपासून त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.