शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

थातूर-मातूर सफाईचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून प्रभागात स्वच्छतेचा अभाव जाणविला तर काही नागरिकांनीही बोलून दाखविले.

ठळक मुद्देप्रभागात स्वच्छतेचा अभाव : रस्त्यांचे जाळे मात्र नाल्या बरबटलेल्याच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील काही भागासह बाजार भागाला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक ७ चे क्रांती जायस्वाल व शिलू ठाकूर नगर परिषद सदस्य आहेत. सिव्हील लाईन्स कारा चौक परिसरातून सुरू होत असलेल्या या प्रभागात मनोहर चौक, प्रभात टॉकीज चौक, गांधी पुतळा, घाट रोड, ठाकूर मोहल्ला येतो. प्रभागात रस्त्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाणी व गाळाने नाल्या बरबटलेल्या आढळल्या. यातून प्रभागात स्वच्छतेचा अभाव जाणविला तर काही नागरिकांनीही बोलून दाखविले.सिव्हील लाईन्स परिसरातील काका चौकातून प्रभागाची सुरूवात झाली असून पुढे मनोहर चौक परिसरात सांडपाणी व गाळाने बरबटलेल्या नाल्या दिसल्या. त्यांच्या शेजारी काढण्यात आलेले गाळ व कचऱ्याचे ढिगार दिसले.परिसरातील नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त करीत माणसं बोलावून सफाई करावी लागत असल्याचे सांगितले. मनोहर चौकात मोठा खड्डा तयार झाला असून पाणी साचलेले दिसले व त्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. पुढे मनोहर चौकातून प्रभात टॉकीज होत गांधी पुतळापर्यंत मुख्य मार्ग असून हा परिसर बाजार भागातच येतो.पुढे घाट रोड परिसरातील जगन्नाथ मंदिर व ठाकूर मोहल्लात जावून बघितले असता येथे नाल्यांमध्ये गवत उगवलेले दिसले. यातून या नाल्यांच्या सफाईचा प्रश्न पडला. विशेष म्हणजे, मान्सून बघताही या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे दिसले. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक येतात असे सांगीतले. कचरागाडी दररोज कचरा संकलनासाठी येते असेही सांगीतले. मात्र झाडू लावणारे येत नसल्याचेही बोलून दाखविले. बाजार भागासह सिव्हील लाईन्स परिसरातील जुना रहिवासी भाग असल्याने येथे रस्ते व नाल्यांचे जाळे दिसले. मात्र स्वच्छतेचा अभाव ही जाणवला.नागरिकांनी व्यक्त केली नाराजीमनोहर चौक ते काका चौक परिसरातील काही नागरिकांनी बरबटलेल्या नाल्यांची स्थिती दाखवून स्वच्छतेची समस्या व्यक्त केली. एवढेच नव्हे तर माणसं बोलावून स्वत: सफाई करवून घ्यावी लागते असेही सांगीतले. यातून प्रभागातील स्वच्छतेचे चित्र दाखवून देत आपली नाराजी व्यक्त केली.प्रभागातील कचराकुंड्या तुडुंबप्रभागातील काही ठिकाणच्या कचराकुंड्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असल्याचे दिसले. यातून या कचराकुंड्यातील कचऱ्याची उचल किती दिवसांपासून झालेली नाही असा प्रश्न पडला. पावसाळा असल्याने प्रभागात आता खऱ्या अर्थाने स्वच्छतेची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पाईप आहे पण नळ तुटलेलेजगन्नाथ मंदिरपासून काही अंतर पुढे पाण्यासाठी असलेले सार्वजनिक नळ दिसून आले. मात्र येथे पाईपलाईन दिसली. त्यावर लागलेले नळ तुटलेले दिसले. अशात या नळाला पाणी आल्यास पाण्याचा नासाडी होणार यात शंका नाही. मात्र या प्रकाराकडे नागरिक व नगरसेवक दोघांचेही दुर्लक्ष दिसून आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान