शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
2
“काँग्रेसनेच संविधान कलंकित केले, मतचोरी करून इंदिरा गांधींचा रायबरेलीत विजय”: निशिकांत दुबे
3
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
4
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
5
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
6
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
7
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
8
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
9
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
10
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
11
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
12
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
13
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
14
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
15
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
16
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
17
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
18
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
19
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
20
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:48 IST

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुकास्तरीय स्वदेशी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे. कारण स्वदेशी खेळ कमी खर्चाचे व मेहनती असून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासोबतच शारीरिक व बौद्धिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम कारंजा येथे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने बुधवारी (दि.९) आयोजित तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित होत्या. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ प्रत्येकच विद्यार्थ्याला त्याची योग्यता दाखविण्याची संधी देते. तेथेच पुरस्काराच्या माध्यमातून मंडळ उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना सन्मानीत करते. यातूनच अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून तेच भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना अधीक योग्यरित्या तयार करीत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला योगराज उपराडे, माधुरी हरिणखेडे, चमनलाल बिसेन, स्नेह गौतम, धनवंता उपराडे, महेंद्र शहारे, विजय बन्नाटे, प्रकाश रहमतकर, विमल नागपुरे, रजनी गौतम, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, कुंदन कटारे, खुशबू टेंभरे, भोजराज चुलपार, ओमप्रकाश भक्तवर्ती, इंद्रायणी कावळे, प्रिया बंसोड, प्रकाश डहाट, अखिलेश सेठ, जयप्रकाश बिसेन, किर्ती पटले, सुनिता दोनोडे, छाया दसरे, शामकला पाचे, कमलेश्वरी लिल्हारे, निता पटले, अनिल मते, विनिता टेंभरे, प्रमिला करचाल, प्रकाश देवाधारी, प्रकाश पटले यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.देशाच्या निर्मितीची दशा व दिशा तय करणारे शिक्षकचयाप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, स्वदेशी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक केले. त्यांनी देशाच्या निर्मितीची दशा व दिशा तय करण्याचा दम ठेवणारे शिक्षकच असतात. ते ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षित करतात, त्याचप्रकारे येणारा देश बनणार. यामुळे प्रत्येकच शिक्षकाने अत्यंत गंभीरता व पूर्ण निष्ठेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल