शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे उठले नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:23 IST

जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला.

ठळक मुद्देनागरिक दाखल करणार जनहित याचिका : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. परिणामी हे खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.शहरातील रस्ते नव्हे तर आमगाव-देवरी, गोंदिया- देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी, गोंदिया-तिरोडा यासर्वच मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. डाबंरी रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने न बुजविल्याने त्यात पावसाचे पाणी साचून त्यांना आता गटारे स्वरुप आले आहे. यासर्वच मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र खड्डयांमुळे गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत खड्डयांमुळे चार जणांना नाहक जीव गमवावा लागला. तर पंधरा ते वीस जणांना गंभीर दुखापत झाली. खड्डयांमुळे रस्त्यांची चाळणी झाल्याचे चित्र असताना रस्त्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहे. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर या विभागाने डांबरी रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचा प्रताप केला. मात्र त्यानंतर झालेल्या पावसाने खड्डयांमध्ये भरलेले मुरूम वाहून गेले. त्यामुळे खड्डे पुन्हा जैसे थे झाले. रस्त्यांवरील खड्डयांकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करित असल्याने आता नागरिकांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे.गोंदिया येथील आठ ते दहा नागरिकांनी एकत्र येत रस्त्यांवरील खड्डयांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत रस्त्यांवर आत्तापर्यंत करण्यात आलेला खर्च, रस्ते अपघातात किती बळी गेले, कितीदा रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली. याची माहिती मागविली आहे.बांधकाम विभागाचे हात वरजिल्ह्यातील मुख्य मार्गावरील रस्ते दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. नागरिकांनी जेव्हा या विभागाकडे रस्त्यांवरील खड्डयांची तक्रार केली. तेव्हा या विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत हातवर केले. विशेष म्हणजे या विभागातर्फे दरवर्षी रस्ते दुरूस्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र त्यानंतर रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने हे कोट्यवधी रुपये कोणाच्या घश्यात जातात.यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.अधिकाºयांना कंत्राटदारांची काळजीरस्त्यांवरील खड्डयांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांचा बळी गेला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डयांकडे लक्ष देण्याची गरज वाटली नाही. नागरिकांच्या हितापेक्षा त्यांना कंत्राटदारांच्या हिताची अधिक काळजी असल्याची ओरड आता नागरिक करित आहे.