शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

खड्डे उठले नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:23 IST

जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला.

ठळक मुद्देनागरिक दाखल करणार जनहित याचिका : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कुठल्याही मार्गावरुन गेल्यास त्या रस्त्यांवर खड्डे नसतील तर नवलच म्हणावे लागेल. याच खड्ड्यांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांना जीव गमावावा लागला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. परिणामी हे खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.शहरातील रस्ते नव्हे तर आमगाव-देवरी, गोंदिया- देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी, गोंदिया-तिरोडा यासर्वच मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. डाबंरी रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने न बुजविल्याने त्यात पावसाचे पाणी साचून त्यांना आता गटारे स्वरुप आले आहे. यासर्वच मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र खड्डयांमुळे गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत खड्डयांमुळे चार जणांना नाहक जीव गमवावा लागला. तर पंधरा ते वीस जणांना गंभीर दुखापत झाली. खड्डयांमुळे रस्त्यांची चाळणी झाल्याचे चित्र असताना रस्त्यांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहे. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर या विभागाने डांबरी रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचा प्रताप केला. मात्र त्यानंतर झालेल्या पावसाने खड्डयांमध्ये भरलेले मुरूम वाहून गेले. त्यामुळे खड्डे पुन्हा जैसे थे झाले. रस्त्यांवरील खड्डयांकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करित असल्याने आता नागरिकांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे.गोंदिया येथील आठ ते दहा नागरिकांनी एकत्र येत रस्त्यांवरील खड्डयांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत रस्त्यांवर आत्तापर्यंत करण्यात आलेला खर्च, रस्ते अपघातात किती बळी गेले, कितीदा रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली. याची माहिती मागविली आहे.बांधकाम विभागाचे हात वरजिल्ह्यातील मुख्य मार्गावरील रस्ते दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. नागरिकांनी जेव्हा या विभागाकडे रस्त्यांवरील खड्डयांची तक्रार केली. तेव्हा या विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत हातवर केले. विशेष म्हणजे या विभागातर्फे दरवर्षी रस्ते दुरूस्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र त्यानंतर रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने हे कोट्यवधी रुपये कोणाच्या घश्यात जातात.यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.अधिकाºयांना कंत्राटदारांची काळजीरस्त्यांवरील खड्डयांमुळे मागील पंधरा दिवसात चार जणांचा बळी गेला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डयांकडे लक्ष देण्याची गरज वाटली नाही. नागरिकांच्या हितापेक्षा त्यांना कंत्राटदारांच्या हिताची अधिक काळजी असल्याची ओरड आता नागरिक करित आहे.