शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

आपत्ती व्यवस्थापन विभागाची कामगिरी मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

गोंदिया : यावर्षी जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शोध व बचाव पथकामार्फत त्यांचे मृतदेह रेस्क्यू करून ...

गोंदिया : यावर्षी जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शोध व बचाव पथकामार्फत त्यांचे मृतदेह रेस्क्यू करून काढण्यात आले. मान्सून कालावधीत वेगवेगळ्या घटनांमध्ये तत्काळ प्रतिसाद देऊन जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व शोध बचाव पथकाने केलेली कामगिरी मोलाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापन विभाग व शोध बचाव पथकाचा गौरव करण्यासाठी शुक्रवारी (दि.२४) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, दीपक परिहार, आकाश चव्हाण, रूपचंद नाकाडे, सुपचंद लिल्हारे तसेच शोध व बचाव पथकाचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे (नागपूर) मार्गदर्शन घेऊन जिल्ह्यातील शोध बचाव पथकाची क्षमता बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच प्रशासन व नागरिक हे समाजातील घटकांच्या दोन बाजू आहेत. अशा परिस्थितीत आपत्ती दरम्यान प्रशासन व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. ‘सजग नागरिक-सुरक्षित नागरिक’ या सूत्राचे पालन करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

--------------------------

सेल्फीचा मोह टाळा

सद्यस्थितीत धरण, जलाशय, तलाव, नदी, नाले इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढली असून अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. तसेच या ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा व पाण्यात बोटिंग करताना लाइफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

-----------------------

शोध व बचाव साहित्यांची केली पाहणी

याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपलब्ध असलेल्या शोध व बचाव साहित्यांची पाहणी केली. त्यांनी पूरपरिस्थिती दरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी रबर-फायबर बोटी, लाइफ जॅकेट, लाइफबॉय, इमर्जंसी लाईट, ओबीएम मशीन, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस, सर्चलाईटची पाहणी केली. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती दरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना, जिल्हा नियंत्रण कक्षाचे संचालन, मानक कार्यपद्धती व पूर दरम्यान संबंधित सर्व विभागांचे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे कौतुक केले.