शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी,अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांनी वर्षभर कुटुंबासह शेतात राबराब राबून आणि रक्ताचे पाणी करुन आणि कर्जाची उचल करुन खरीपाची तयारी केली. सुदैवाने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिकाची सुध्दा चांगली स्थिती होती. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांनंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. मात्र मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा आणि अपेक्षांवर पाणी फेरले.

ठळक मुद्देसंडे अँकर । नुकसानीचे युद्धस्तरावर पंचनामे सुरु, नुकसानीचा आकडा वाढणार, किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली होती. त्या धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्याने धानपिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. दरम्यान नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले. यानंतर शनिवारी (दि.२) जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नुकसानीची पाहणी केली. या वेळी आ.मनोहर चंद्रिकापूरे हे सुध्दा उपस्थित होते.परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील धान पिकांना बसल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले होते.या दोन तालुक्यात परतीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात केवळ तणसच शिल्लक असून ती देखील जनावरांना खान्या योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे.शेतकऱ्यांनी वर्षभर कुटुंबासह शेतात राबराब राबून आणि रक्ताचे पाणी करुन आणि कर्जाची उचल करुन खरीपाची तयारी केली. सुदैवाने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिकाची सुध्दा चांगली स्थिती होती. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांनंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. मात्र मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा आणि अपेक्षांवर पाणी फेरले. दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली होती. कापणी केलेल्या धानाची लवकर मळणी आणि विक्री करुन दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न शेतकरी पाहत होते. मात्र त्यांच्या स्वप्नावर परतीच्या पावसाने पाणी फेरले.काही शेतकऱ्यांच्या शेतातील धानाला कोंब फुटले असून काहीच उत्पादन होणार नाही. तर काही शेतकऱ्यांचे धानाच्या कडपा पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणात पाखड झाला. त्यामुळे त्याला सुध्दा मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.दरम्यान परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.शनिवारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सडक अर्जुनी,अर्जुनी मोरगाव तालुक्याचा दौरा करुन धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली.शेतकऱ्यांनी दाखविल्या धानाच्या कडपासडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा जमी., पुतळी या गावातील धानपिकाचे परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. शनिवारी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ. मनोहर चंद्रिकापूरे यांनी सुध्दा या भागात पोहचत धान पिकाची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना धानपिकाच्या नुकसानीची माहिती देत शेतकऱ्यांचे कसे कंबरडे मोडले आहे हे सांगितले. या वेळी काही शेतकऱ्यांनी पावसामुळे कोंबे फुटलेल्या धानाच्या कडपा आणि किडरोगामुळे धानाची झालेली तणस जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून नुकसानीची जाणीव करुन दिली. धानाच्या कडपा दाखवितांना शेतकऱ्यांचे डोळे पानावले होते.शेतकऱ्यांच्या अर्जांचा खचजिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका धानपिकाला सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे तीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.मात्र यासाठी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे.त्यामुळे दोन दिवसात विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे शेतकऱ्यांच्या अर्जांचा खच पडल्याची माहिती आहे.प्रत्येक दिवस, तास महत्त्वाचे आहेत. केवळ रिर्पोटिंग करण्यापेक्षा आधी नुकसानीचे पंचनामे करा. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे सुटली असतील त्यांनी लगेच कळवावे. दोन दिवसात पंचनामे तयार करुन तसा अहवाल कृषी, महसूल आणि पीक विमा कंपनीच्या यंत्रणेने द्यावा.- डॉ. कादंबरी बलकवडे,जिल्हाधिकारी गोंदिया..................................परतीच्या पावसामुळे खराब झालेला धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे त्वरीत तयार करुन पाठवावा. पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची यंत्रणेने काळजी घ्यावी.- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी