शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या सोडवाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:17 IST

लोकप्रतिनिधींवर लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी असते. मात्र वेळीच ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच वेळी करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : धमदीटोला येथे धुर्व गोंड समाजाचा आदर्श सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : लोकप्रतिनिधींवर लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी असते. मात्र वेळीच ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच वेळी करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील धमदीटोला येथे अमित विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (दि.२८) आदिवासी बहुउद्देशिय धुर्व गोंड समाज संस्थेच्या वतीने आदिवासी धुर्व गोंड समाजाचा आदर्श सामूहिक विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम यांच्या हस्ते, धमदागडचे केंद्रीय अध्यक्ष एम.डी. ठाकूर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सदस्य गणेश तोफे, डीआरडीए सदस्य हरिचंद उईके, ओरडबांध महासभेचे प्रवक्ता प्रेमदास पंधरे, महामंत्री उत्तम मरकाम, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश राऊत, माजी सभापती देवकी मरई, वसंत पुराम, काँग्रेस कार्यकर्ते छगनलाल मुंगनवार उपस्थित होते.कोरोटे पुढे म्हणाले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांचे व त्यांच्या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याकरिता शासनाने विविध लोकसभा व विधानसभा क्षेत्र त्या-त्या समाजाकरिता आरक्षित ठेवले आहे. त्या क्षेत्रातून खासदार व आमदार निवडून येतात. मात्र ते लोकसभा किंवा विधानसभेत जेथे लोकांच्या हितार्थ कायदा आणि निर्णय घेतले जातात तेथे त्यावेळी त्या कायदा व निर्णयाचा विरोध करीत नाही. मात्र तो कायदा किंवा निर्णय तयार झाल्यानंतर त्या खात्यातील मंत्र्यांना तो कायदा किंवा निर्णय मागे घेण्यासंबंधात निवेदन देतात. ही त्या लोकप्रतिनिधींची शोकांतिका आहे. असे न करता ज्यावेळी शासन लोकांच्या विरुद्ध कायदा किंवा निर्णय घेते त्याचवेळी विरोध करुन असा निर्णय किंवा कायदा तयार करण्यास रोखू शकेल तोच खरा लोकप्रतिनिधी म्हणता येईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा कमिटी सदस्य सोनू नेताम यांनी मांडले.संचालन पंचराम मडावी यांनी केले. आभार किशोर नेताम यांनी मानले. या वेळी परिसरातील महिला, पुरुष व युवा वर्ग तसेच वºहाडी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.१० जोडपी परिणयबद्धसदर विवाह सोहळ्यात आदिवासी समाजातील एकूण १० जोडप्यांना सामूहिकरित्या परिणयबद्ध करण्यात आले. या वेळी उपस्थित पाहुण्यांनी सर्व जोडप्यांना भेटवस्तू व आशीर्वाद दिला.