शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जनता धडा शिकविणार

By admin | Updated: February 22, 2016 01:58 IST

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात काही दिवसांपूर्वी काही देशविरोधी तत्वांनी भारत विरोधात नारेबाजी करून दहशतवाद समर्थित आंदोलन केले होते.

हेमंत पटले : देशद्रोही व त्यांच्या समर्थकांची गय नाही, हस्ताक्षर अभियानगोंदिया : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात काही दिवसांपूर्वी काही देशविरोधी तत्वांनी भारत विरोधात नारेबाजी करून दहशतवाद समर्थित आंदोलन केले होते. त्यांच्या या कृत्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेस, साम्यवादी व त्यांच्या मित्रपक्षांनी समर्थन केले होते. हे अविवेकी व राजकीय दिवाळखोरीचे लक्षण असून आपण कुठल्या गोष्टीला समर्थन करतो, याचे त्यांना भान नाही. दहशतवाद्यांचे समर्थन व देशाविरोधात बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.भारतीय जनता पक्षाद्वारे देशव्यापी जन स्वाभिमान अभियानांतर्गत शनिवारी आंबेडकर चौकात धरणे आंदोलन व हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.ते पुढे म्हणाले, त्यांचे चेहरे आता समोर आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर अग्रेसर असून देशाच्या देशाच्या एकता, अखंडतेला तडा देण्याचे कार्य काही राजकीय शक्तीद्वारे केले जात आहे. त्यामुळे जनतेच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणाऱ्या व त्याचे समर्थन करणाऱ्यांना आता जनताच धडा शिकविणार, असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रामुख्याने आ. विजय रहांगडाले, माजी आ.डॉ. खुशाल बोपचे, केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, खोमेश्वर रहांगडाले, माजी आ. हरिश मोरे, विनोद अग्रवाल, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस सीता रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. सभापती छाया दसरे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, संतोष चव्हाण, शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, दिनेश दादरीवाल, संजय कुलकर्णी, नंदकुमार बिसेन उपस्थित होते.धरणे आंदोलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता करण्यात आली. सर्वप्रथम भारत माता व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी जेएनयू घटनेच्या निषेधार्थ हस्ताक्षर अभियानाला शेकडो लोकांनी हस्ताक्षर केले. आंदोलनादरम्यान आ. विजय रहांगडाले यांनी जनतेला संबोधित करताना, ज्या ताटात खातात त्याच ताटाच छिद्र करणाऱ्या गद्दारांना हा देश कधीही माफ करणार नाही. तर डॉ. बोपचे यांनी, जेएनयूमध्ये देशविरोधी कारवायांचा क्रम अनेकदा उघडकीस आला आहे. मात्र आता जे कृत्य त्यांनी केले आहे, याचे उत्तर या देशाची देशभक्त जनता देणार असून या देशद्रोहींना कठोर शिक्षा व्हावी व त्यांच्या समर्थकांचा धिक्कार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, खोमेश रहांगडाले, हरिश मोरे, विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, सीता रहांगडाले, दिनेश दादरीवाल, भरत क्षत्रीय, छाया दसरे, महेश आहुजा, धनंजय तुरकर, बार असोसिएशनचे पराग तिवारी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध केला.आंदोलनादरम्यान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मंडपाला भेट देवून हस्ताक्षर मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. तसेच भारत माता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तसेच वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. कटरे व अनेक संघटनांच्या वतीने जन स्वाभिमान अभियानाला समर्थ देत मंडपाला भेट दिली. संचालन जयंत शुक्ला यांनी केले.या वेळी भाऊराव उके, गणेश हेमणे, भाऊदास कठाणे, लिखेंद्र बिसेन, श्यामलाल ठाकरे, उमाकांत ढेंगे, प्रदिपसिंह ठाकूर, मुनाफ कुरेशी, किशोर हालानी, जि.प. सदस्य शैलजा सोनवाने, विश्वजित डोंगरे, कमलेश्वर लिल्हारे, श्यामकला पाचे, नगरसेवक शिव शर्मा, राहुल यादव, मैथुला बिसेन, श्रद्धा अग्रवाल, घनश्याम पानतवने, संजय मुरकुटे, सोमाजी गणवीर, राजेश चतुर, हरिप्रसाद चिखलोंढे आदी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनेचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)