शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

जनता धडा शिकविणार

By admin | Updated: February 22, 2016 01:58 IST

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात काही दिवसांपूर्वी काही देशविरोधी तत्वांनी भारत विरोधात नारेबाजी करून दहशतवाद समर्थित आंदोलन केले होते.

हेमंत पटले : देशद्रोही व त्यांच्या समर्थकांची गय नाही, हस्ताक्षर अभियानगोंदिया : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात काही दिवसांपूर्वी काही देशविरोधी तत्वांनी भारत विरोधात नारेबाजी करून दहशतवाद समर्थित आंदोलन केले होते. त्यांच्या या कृत्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेस, साम्यवादी व त्यांच्या मित्रपक्षांनी समर्थन केले होते. हे अविवेकी व राजकीय दिवाळखोरीचे लक्षण असून आपण कुठल्या गोष्टीला समर्थन करतो, याचे त्यांना भान नाही. दहशतवाद्यांचे समर्थन व देशाविरोधात बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.भारतीय जनता पक्षाद्वारे देशव्यापी जन स्वाभिमान अभियानांतर्गत शनिवारी आंबेडकर चौकात धरणे आंदोलन व हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.ते पुढे म्हणाले, त्यांचे चेहरे आता समोर आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर अग्रेसर असून देशाच्या देशाच्या एकता, अखंडतेला तडा देण्याचे कार्य काही राजकीय शक्तीद्वारे केले जात आहे. त्यामुळे जनतेच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणाऱ्या व त्याचे समर्थन करणाऱ्यांना आता जनताच धडा शिकविणार, असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रामुख्याने आ. विजय रहांगडाले, माजी आ.डॉ. खुशाल बोपचे, केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, खोमेश्वर रहांगडाले, माजी आ. हरिश मोरे, विनोद अग्रवाल, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस सीता रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. सभापती छाया दसरे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, संतोष चव्हाण, शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, दिनेश दादरीवाल, संजय कुलकर्णी, नंदकुमार बिसेन उपस्थित होते.धरणे आंदोलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता करण्यात आली. सर्वप्रथम भारत माता व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी जेएनयू घटनेच्या निषेधार्थ हस्ताक्षर अभियानाला शेकडो लोकांनी हस्ताक्षर केले. आंदोलनादरम्यान आ. विजय रहांगडाले यांनी जनतेला संबोधित करताना, ज्या ताटात खातात त्याच ताटाच छिद्र करणाऱ्या गद्दारांना हा देश कधीही माफ करणार नाही. तर डॉ. बोपचे यांनी, जेएनयूमध्ये देशविरोधी कारवायांचा क्रम अनेकदा उघडकीस आला आहे. मात्र आता जे कृत्य त्यांनी केले आहे, याचे उत्तर या देशाची देशभक्त जनता देणार असून या देशद्रोहींना कठोर शिक्षा व्हावी व त्यांच्या समर्थकांचा धिक्कार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, खोमेश रहांगडाले, हरिश मोरे, विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, सीता रहांगडाले, दिनेश दादरीवाल, भरत क्षत्रीय, छाया दसरे, महेश आहुजा, धनंजय तुरकर, बार असोसिएशनचे पराग तिवारी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध केला.आंदोलनादरम्यान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मंडपाला भेट देवून हस्ताक्षर मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. तसेच भारत माता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तसेच वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. कटरे व अनेक संघटनांच्या वतीने जन स्वाभिमान अभियानाला समर्थ देत मंडपाला भेट दिली. संचालन जयंत शुक्ला यांनी केले.या वेळी भाऊराव उके, गणेश हेमणे, भाऊदास कठाणे, लिखेंद्र बिसेन, श्यामलाल ठाकरे, उमाकांत ढेंगे, प्रदिपसिंह ठाकूर, मुनाफ कुरेशी, किशोर हालानी, जि.प. सदस्य शैलजा सोनवाने, विश्वजित डोंगरे, कमलेश्वर लिल्हारे, श्यामकला पाचे, नगरसेवक शिव शर्मा, राहुल यादव, मैथुला बिसेन, श्रद्धा अग्रवाल, घनश्याम पानतवने, संजय मुरकुटे, सोमाजी गणवीर, राजेश चतुर, हरिप्रसाद चिखलोंढे आदी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनेचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)