शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भवभूतींविषयी विदर्भवासीयांनी रास्त अभिमान बाळगावा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

गोंदिया : भवभूती हे वैदर्भीय संस्कृत महाकवी असून, ते कविकुलगुरु कालिदासांच्या समकक्ष मानले जातात. अनेक श्रेष्ठ साहित्यिक या दोन्ही ...

गोंदिया : भवभूती हे वैदर्भीय संस्कृत महाकवी असून, ते कविकुलगुरु कालिदासांच्या समकक्ष मानले जातात. अनेक श्रेष्ठ साहित्यिक या दोन्ही महाकवींची तुलना करण्यात स्वत:ला धन्य समजतात. महाकवी भवभूती हे विदर्भाच्या अतिपूर्वेकडील पद‌्मपूर (आमगाव) येथे आठव्या शतकात होऊन गेले. त्यामुळे भवभूतींविषयी विदर्भवासीयांनी रास्त अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन इतिहासकार प्राचार्य ओ. सी. पटले यांनी केले.

भवभूती रिसर्च अकॅडमीच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. आठव्या शतकात पद‌्मपूर ही एक धर्ममय नगरी असून, राष्ट्रकुट राजवंशाची राजधानी होती. भवभूतींच्या काळात पद‌्मपूर येथे राजा नन यांचे शासन होते. प्राचीन पद‌्मपूर नगरीच्या ठिकाणी सध्या पद‌्मपूर नावाचे गाव आहे. पद‌्मपूरच्या परिसरात प्राचीन पद‌्मपूर नगरीचे असंख्य अवशेष आढळतात. ब्रिटिश शासनकाळापासून पद‌्मपूर हे पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. अशा आशयाचे लोखंडी फलक पद‌्मपूर परिसरात लागले आहे. सध्या पद‌्मपूरच्या फक्त ३ किमी. पूर्वेस आमगाव हे शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगतनगर तालुक्याचे ठिकाण आहे. पद‌्मपूर व भवभूतींच्या इतिहासाला प्रकाश झोतात ठेवण्याचे कार्य फार पूर्वीपासून आमगावच्याच कोणत्या ना कोणत्या भवभूतींच्या चाहत्यांकडून होत आहे.

सन २०००मध्ये भवभूती रिसर्च अकॅडमी तयार करण्यात आली. या अकॅडमीने सहा महिने पद‌्मपूरला नित्य नियमित जाऊन ऐतिहासिक अवशेष व भवभूतींच्या इतिहासावर संशोधन केले. या काळात त्यांनी काही भूमिगत ऐतिहासिक पाषाण प्रतिमा जमिनीतून बाहेर काढल्या. उपयुक्त ठिकाणी त्यांची जमवाजमव केली. आवश्यक फोटोग्राफ‌्स काढून घेतले. हे करीत असताना नागपूरहून प्रकाशित होत असलेल्या सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांतून भवभूती व पद‌्मपूरच्या इतिहासाविषयी बातम्या झळकल्या. परिणामस्वरूप पुरातत्व विभाग नागपूर व औरंगाबाद शाखांनी पद‌्मपूरच्या ऐतिहासिक अवशेषांचे संरक्षण करण्याकडे विशेष लक्ष पुरवून अनेक ठिकाणी सुरक्षा भिंती उभाराव्या लागल्या. पद‌्मपूर येथील ऐतिहासिक अवशेषांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने जी संरक्षणात्मक व्यवस्था दिसून येत आहे, त्याचे श्रेय भवभूती रिसर्च अकॅडमी या संस्थेला आहे. भवभूती हे विदर्भाचे एक तेजस्वी मानबिंदू आहेत. वैदर्भीय साहित्यिकांनी भवभूतींना आपल्या लिखाणात केंद्रीय स्थान देऊन त्यांना अमाप लोकप्रियता प्राप्त करून द्यावी, असेही इतिहासकार प्राचार्य पटले यांनी म्हटले आहे. यावेळी भवभूती रिसर्च अकॅडमीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.