शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

खोटी आश्वासने देणाºयांना जनतेने धडा शिकविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:22 IST

जिल्ह्यात अलीकडेच पार पडलेल्या ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि विकासात्मक कामांवर विश्वास टाकला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्रा.पं. निवडणुकीत सर्वाधिक जागांचा दावा

गोंदिया : जिल्ह्यात अलीकडेच पार पडलेल्या ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि विकासात्मक कामांवर विश्वास टाकला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात १८९ ग्रामपंचायतीवर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस समर्थीत सर्वाधिक उमेदवार निवडून आले. जनतेने मतपेटीतून खोटी आश्वासने देणाºयांना धडा शिकविल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर ते गोंदिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते. अग्रवाल म्हणाले, ३४७ ग्रामपंचायतीपैकी काँग्रेसने ११६, राष्टÑवादी काँग्रेस ७३, अपक्ष १२ आणि शिवसेना समर्थीत ४ सरपंच निवडून आले. तर भाजपला केवळ १३९ सरपंच निवडून आणता आले. काँग्रेस आणि राष्टÑवादी समर्थीत सरपंचाची बेरीज केल्यास १८९ ग्रामपंचायतीवर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली आहे. तर भाजप आणि शिवसेनेचे १४३ सरपंच निवडून आले. याचाच अर्थ ग्रामीण भागातील जनता आता सरकारच्या खोट्या आश्वासनामुळे त्रस्त झाली आहे.वाढती महागाई आणि जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर यामुळे गोरगरिबांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्याचाच रोष ग्रामीण भागातील मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे अग्रवाल म्हणाले. भाजपा केवळ सोशल मिडियावर खोटी आकडेवारी टाकून जनतेची दिशाभूल करित असल्याचा आरोप केला. मात्र जनतेने भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखला आहे. त्यामुळे जनता भाजपा सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचे सांगितले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे म्हणाले, ज्या विश्वासाने मतदारांनी लोकसभा आणि विधानसभेत भाजपा उमेदवारांना निवडून दिले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यामुळे मतदारांचा मोहभंग झाला. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेमध्ये सरकारप्रती रोष असल्याचे सांगितले.लहीटोला ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडातालुक्यातील लहीटोला येथील ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस समर्थीत पॅनल तयार करुन लढविण्यात आली. या निवडणुकीत सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. सरपंचपदी दिनेश तुरकर निवडून आले. लहीटोला येथे निवडून आलेल्या उमेदवारांनी तुरकर यांच्या नेतृत्त्वात आमदार गोपालदास अग्रवाल यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी अग्रवाल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, क्रितीलाल नागपुरे, देवकला चुलपार, लक्ष्मीचंद चचाने, सिंधू मेश्राम, केशरबाई गौरखंडे, शैलेश सहारे, सागणबाई चुलपार उपस्थित होते.