शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

खोटी आश्वासने देणाºयांना जनतेने धडा शिकविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:22 IST

जिल्ह्यात अलीकडेच पार पडलेल्या ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि विकासात्मक कामांवर विश्वास टाकला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्रा.पं. निवडणुकीत सर्वाधिक जागांचा दावा

गोंदिया : जिल्ह्यात अलीकडेच पार पडलेल्या ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि विकासात्मक कामांवर विश्वास टाकला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात १८९ ग्रामपंचायतीवर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस समर्थीत सर्वाधिक उमेदवार निवडून आले. जनतेने मतपेटीतून खोटी आश्वासने देणाºयांना धडा शिकविल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर ते गोंदिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते. अग्रवाल म्हणाले, ३४७ ग्रामपंचायतीपैकी काँग्रेसने ११६, राष्टÑवादी काँग्रेस ७३, अपक्ष १२ आणि शिवसेना समर्थीत ४ सरपंच निवडून आले. तर भाजपला केवळ १३९ सरपंच निवडून आणता आले. काँग्रेस आणि राष्टÑवादी समर्थीत सरपंचाची बेरीज केल्यास १८९ ग्रामपंचायतीवर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली आहे. तर भाजप आणि शिवसेनेचे १४३ सरपंच निवडून आले. याचाच अर्थ ग्रामीण भागातील जनता आता सरकारच्या खोट्या आश्वासनामुळे त्रस्त झाली आहे.वाढती महागाई आणि जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर यामुळे गोरगरिबांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्याचाच रोष ग्रामीण भागातील मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे अग्रवाल म्हणाले. भाजपा केवळ सोशल मिडियावर खोटी आकडेवारी टाकून जनतेची दिशाभूल करित असल्याचा आरोप केला. मात्र जनतेने भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखला आहे. त्यामुळे जनता भाजपा सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचे सांगितले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे म्हणाले, ज्या विश्वासाने मतदारांनी लोकसभा आणि विधानसभेत भाजपा उमेदवारांना निवडून दिले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यामुळे मतदारांचा मोहभंग झाला. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेमध्ये सरकारप्रती रोष असल्याचे सांगितले.लहीटोला ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडातालुक्यातील लहीटोला येथील ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस समर्थीत पॅनल तयार करुन लढविण्यात आली. या निवडणुकीत सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. सरपंचपदी दिनेश तुरकर निवडून आले. लहीटोला येथे निवडून आलेल्या उमेदवारांनी तुरकर यांच्या नेतृत्त्वात आमदार गोपालदास अग्रवाल यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी अग्रवाल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, क्रितीलाल नागपुरे, देवकला चुलपार, लक्ष्मीचंद चचाने, सिंधू मेश्राम, केशरबाई गौरखंडे, शैलेश सहारे, सागणबाई चुलपार उपस्थित होते.