शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील जनता शासकीय योजनांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

केशोरी : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर ...

केशोरी : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर जात असल्याचे चित्र आहे.

आदिवासी भागात असलेल्या प्रत्येक घरांमधील व्यक्तींचे दैनंदिन जीवन उंचावण्यासाठी शासनाने विविध लोकपयोगी योजना कार्यान्वित करुन योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असले तरी या भागातील गावांची वास्तविक स्थिती पाहता बऱ्याच शासकीय योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले नाही. बोटांवर मोजण्याएवढ्याच काही ग्रामपंचायतींनी कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेतल्याची माहिती आहे. काही गावांत ज्या गरजू कुटुंबांना राहत्या घराची अत्यंत आवश्यकता आहे, त्यांना घरे मंजूर न करता गरज नसणाऱ्या कुटुंबांना घरे मंजूर झाल्याचे प्रकार कमी झाले आहेत.

..........

या समस्या झाल्या निर्माण

काही गावांतील गाव, रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत; परंतु दुरुस्ती करण्यात आली नाही. काही शेतकऱ्यांना अजूनही वनहक्क जमिनीचे पट्टे मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे मिळाले तर त्यांनी त्या जमिनीत उत्पादित केलेले धान पिकाची खरेदी आधारभूत धान खरेदी केंद्रावर केली जात नाही. काही गावांमधून आदिवासी विकास महामंडळाचे ग्रेडर शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे करीत आहेत.

..........

रोजगाराचा प्रश्न झाला गंभीर

श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, वयोवृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजनेपासून अनेक लाभार्थी अजूनही वंचित आहेत. या आदिवासी भागातील गावांमध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. रोजगार हमीची कामे सुरू केली गेली नाहीत. यासारख्या अनके शासकीय लोकोपयोगी योजना राबविल्या जात नसल्याने रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. कोरोना महामारीत हातात कोणतेही काम नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या परिसरातील नागरिकांना परराज्यांत धाव घ्यावी लागत आहे.