शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

ग्रामीण भागातील जनता शासकीय योजनांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

केशोरी : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर ...

केशोरी : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर जात असल्याचे चित्र आहे.

आदिवासी भागात असलेल्या प्रत्येक घरांमधील व्यक्तींचे दैनंदिन जीवन उंचावण्यासाठी शासनाने विविध लोकपयोगी योजना कार्यान्वित करुन योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असले तरी या भागातील गावांची वास्तविक स्थिती पाहता बऱ्याच शासकीय योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले नाही. बोटांवर मोजण्याएवढ्याच काही ग्रामपंचायतींनी कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेतल्याची माहिती आहे. काही गावांत ज्या गरजू कुटुंबांना राहत्या घराची अत्यंत आवश्यकता आहे, त्यांना घरे मंजूर न करता गरज नसणाऱ्या कुटुंबांना घरे मंजूर झाल्याचे प्रकार कमी झाले आहेत.

..........

या समस्या झाल्या निर्माण

काही गावांतील गाव, रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत; परंतु दुरुस्ती करण्यात आली नाही. काही शेतकऱ्यांना अजूनही वनहक्क जमिनीचे पट्टे मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे मिळाले तर त्यांनी त्या जमिनीत उत्पादित केलेले धान पिकाची खरेदी आधारभूत धान खरेदी केंद्रावर केली जात नाही. काही गावांमधून आदिवासी विकास महामंडळाचे ग्रेडर शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे करीत आहेत.

..........

रोजगाराचा प्रश्न झाला गंभीर

श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, वयोवृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजनेपासून अनेक लाभार्थी अजूनही वंचित आहेत. या आदिवासी भागातील गावांमध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. रोजगार हमीची कामे सुरू केली गेली नाहीत. यासारख्या अनके शासकीय लोकोपयोगी योजना राबविल्या जात नसल्याने रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. कोरोना महामारीत हातात कोणतेही काम नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या परिसरातील नागरिकांना परराज्यांत धाव घ्यावी लागत आहे.