शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील जनता शासकीय योजनांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

केशोरी : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर ...

केशोरी : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर जात असल्याचे चित्र आहे.

आदिवासी भागात असलेल्या प्रत्येक घरांमधील व्यक्तींचे दैनंदिन जीवन उंचावण्यासाठी शासनाने विविध लोकपयोगी योजना कार्यान्वित करुन योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असले तरी या भागातील गावांची वास्तविक स्थिती पाहता बऱ्याच शासकीय योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे या आदिवासी भागातील जनता शासकीय योजनांपासून कोसो दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले नाही. बोटांवर मोजण्याएवढ्याच काही ग्रामपंचायतींनी कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेतल्याची माहिती आहे. काही गावांत ज्या गरजू कुटुंबांना राहत्या घराची अत्यंत आवश्यकता आहे, त्यांना घरे मंजूर न करता गरज नसणाऱ्या कुटुंबांना घरे मंजूर झाल्याचे प्रकार कमी झाले आहेत.

..........

या समस्या झाल्या निर्माण

काही गावांतील गाव, रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत; परंतु दुरुस्ती करण्यात आली नाही. काही शेतकऱ्यांना अजूनही वनहक्क जमिनीचे पट्टे मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे मिळाले तर त्यांनी त्या जमिनीत उत्पादित केलेले धान पिकाची खरेदी आधारभूत धान खरेदी केंद्रावर केली जात नाही. काही गावांमधून आदिवासी विकास महामंडळाचे ग्रेडर शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे करीत आहेत.

..........

रोजगाराचा प्रश्न झाला गंभीर

श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, वयोवृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजनेपासून अनेक लाभार्थी अजूनही वंचित आहेत. या आदिवासी भागातील गावांमध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. रोजगार हमीची कामे सुरू केली गेली नाहीत. यासारख्या अनके शासकीय लोकोपयोगी योजना राबविल्या जात नसल्याने रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. कोरोना महामारीत हातात कोणतेही काम नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या परिसरातील नागरिकांना परराज्यांत धाव घ्यावी लागत आहे.