शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

जनतेने भाजपला नाकारले, अमित शहांनी राजीनामा द्यावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

गोंदिया : पश्चिम बंगालच्या निवडणुकीला घेऊन भाजपने आकड्यांचा खेळ सुरू केला आहे. तसेच विजयाचा अतिआत्मविश्वास बाळगून हम करे सो ...

गोंदिया : पश्चिम बंगालच्या निवडणुकीला घेऊन भाजपने आकड्यांचा खेळ सुरू केला आहे. तसेच विजयाचा अतिआत्मविश्वास बाळगून हम करे सो कायदा हे धोरण अवलंबले होते. मात्र, पश्चिम बंगाल येथील जनतेने भाजपला नाकारले आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागण्यात आला होता. तेव्हा त्यांनी जनता राजीनामा मागेल तर देऊ, असे सांगितले होते. मात्र, आता पश्चिम बंगालच्या जनतेने भाजप विरुद्ध स्पष्ट कौल दिला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावाअशी मागणी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली.

पालकमंत्री नवाब मलिक हे रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, भाजप नेत्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आकड्याचे गणित मांडत विजयाचा अतिआत्मविश्वास बाळगला होता. तोच अतिआत्मविश्वास भाजपला नडला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या भाजपने सर्वच फंडे उपयोगात आणले. मात्र, त्याचा कसलाच उपयोग झाला नाही. तेथील जनतेने परत एकदा तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत ममता दीदींवर विश्वास व्यक्त केला आहे. तर केवळ पोकळ आश्वासने देऊन जतनेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे जनतेनी दिलेला कौल मान्य करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली.