शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

एकाच भरतीतील ६५ ग्रामसेवकांना पेन्शन तर ४३ मुकले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

गोंदिया : जिल्हा परिषदेने घेतलेल्या ग्रामसेवक भरती प्रकरणात १०८ ग्रामसेवकांपैकी ६५ ग्रामसेवकांना पेन्शन मिळणार तर त्याच भरतीतील ४३ ...

गोंदिया : जिल्हा परिषदेने घेतलेल्या ग्रामसेवक भरती प्रकरणात १०८ ग्रामसेवकांपैकी ६५ ग्रामसेवकांना पेन्शन मिळणार तर त्याच भरतीतील ४३ ग्रामसेवक पेन्शनला मुकणार आहेत. जिल्हा परिषदेने नियुक्ती देण्यास उशीर केल्यामुळे याचा जबरदस्त फटका जिल्ह्यातील या ४३ ग्रामसेवकांना बसला आहे. याकडे शासनाने लक्ष दिल्यास राज्यातील ९०० ग्रामसेवकांना याचा लाभ होईल.

महाराष्ट्रात सप्टेंबर २००५ मध्ये एकाचवेळी कंत्राटी ग्रामसेवक करिता परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्याचाही समावेश होता. जिल्ह्याने निवड पात्र यादी १३ सप्टेंबर २००५ रोजी लावली व यातील ६५ ग्रामसेवकांना १४ सप्टेंबर २००५ रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले. हे ६५ ग्रामसेवक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी लागल्यामुळे जुन्या पेन्शन करिता पात्र ठरले. मात्र याच निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या ईतर ४३ ग्रामसेवकांना नियुक्ती पत्र उशिरा मिळाल्यामुळे ते जुन्या पेन्शन पासून वंचित झाले आहेत. हा प्रकार फक्त गोंदिया जिल्ह्यातच नसून संपूर्ण राज्यात घडला आहे.

या संदर्भात जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी खासदार पटेल यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील ८०० ते ९०० ग्रामसेवकांवर अशाच प्रकारचा अन्याय झाला आहे असे सांगितले. जुनी पेन्शन लागू करून ग्रामसेवकांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, मानद अध्यक्ष कार्तीक चव्हाण, सचिव दयानंद फटींग, सचिन कुथे, कविता बागडे,एल.आर. ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ.के. रहांगडाले, ओ.जी. बिसेन, रितेश शहारे, सुषमा वाढई, सुभाष सीरसाम, रामेश्वर जमईवार, परमेश्वर नेवारे, योगेश रून्रकार, पांडुरंग हरिणखेडे, धर्मेंद्र पारधी यांनी केली आहे.