शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

बोनसची थकीत रक्कम त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:32 IST

परसवाडा : मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची ५० टक्के रक्कम मिळाली ...

परसवाडा : मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची ५० टक्के रक्कम मिळाली नाही. आठ महिन्यांपासून शेतकरी बोनसच्या रकमेसाठी बँका आणि धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवीत आहेत; पण अद्यापही शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे खरीप आणि रबी हंगामातील धान खरेदीत प्रचंड गोंधळ उडाला. खरेदी केलेल्या धानाची उचल वेळेत न झाल्याने व गोदामांची समस्या निर्माण झाल्याने शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याची वेळ या विभागावर आली आहे. अजूनही लाखो क्विंटल धान गोदामांमध्ये तसेच पडले आहे, तर चुकारे आणि बोनसची अर्धी रक्कम अजूनही मिळाली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात उभे राहून खरिपातील रोवणी आणि इतर कामे करावी लागत आहेत, तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सण असलेला पोळा आठ ते दहा दिवसांवर असून, बोनसचे पैसे न मिळाल्याने हा सणसुद्धा त्यांना अंधारात साजरा करण्याची वेळ आली आहे, तर शेतीचा खर्च करण्यासाठीसुद्धा दुसऱ्याकडे हात पसरावे लागत आहेत. त्यामुळे बोनस आणि चुकाऱ्यांची थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.