शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सलग चार दिवसांपासूृन लागतोय रुग्ण वाढीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

गोंदिया : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दीडशेच्या आत येत आहे. तर बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट ...

गोंदिया : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दीडशेच्या आत येत आहे. तर बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याने रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. तर मात करणाऱ्यांचा आलेख सातत्याने उंचावत असून कोरोना आता जिल्ह्यातून काढता पाय घेतल्याचे चित्र आहे. पण यामुळे गाफील न राहता जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेत कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची गरज आहे.

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे मागील आठ दिवसात जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. सोमवारी (दि. १७) जिल्ह्यातील ३६४ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. चार बाधितांचा उपचार दरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ११, गोरेगाव ७, आमगाव २५, सालेकसा ८, देवरी १४, सडक ९, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २१ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,४४,३२० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी १,२०,२५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १,४७,१६० जणांचे नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी १,२६,५५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,४४१ काेरोना बाधित आढळले असून यापैकी ३५,९१४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २,८७९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

.............

मृत्युदरात वाढ

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात येत असून बाधित रुग्णांची संख्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. पण कोरोना बाधित मृतकांचा आलेख सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे मृत्यू दरात वाढ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.६२ टक्के वर पोहचला आहे. मात्र रिकव्हरी रेट ९१.०७ टक्के वर पोहचल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

...........

लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाला गती मिळावी यासाठी विशेष शिबिर घेतले जात आहे. त्यामुळेच लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ४ हजार ६२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

.........

तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये जास्त प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात एकूण शंभर खाटांचे विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे.