शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन पती-पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:06 IST

मागील पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर बालकांचे अपहरण करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवेमुळे संपूर्ण जिल्ह्याभरातच दहशतीचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मागील पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर बालकांचे अपहरण करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवेमुळे संपूर्ण जिल्ह्याभरातच दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावात कोणताही अनोळखी पुरुष अथवा महिला आढळल्यास त्यांची विचारपूस न करता थेट संशय घेवून मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान असाच संशय घेत पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री तालुक्यातील कुंभारटोली येथे घडली.प्राप्त माहितीनुसार कुंभारटोली येथे एका अनोळखी महिला व पुरुषाचा घेराव करुन बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन दोघांना जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान आमगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते दोघे पती-पत्नी असून गोंदिया जिल्ह्यातील अदासी (तांडा) येथील रहिवासी आहेत. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यातील भंगार, खरडे, प्लास्टीक बॉटल इत्यादी गोळा करुन त्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती पुढे आली. रुपचंद देशमुख (४०) व पत्नी कविता रुपचंद देशमुख (३५) अशी त्यांची नावे आहेत. ते कुंभारटोली परिसरात पोहोचले असता परिसरातील लोकांनी बालके चोरी करणारे असल्याच्या संशयावरुन कसलीही शहानिशा न करता मारहाण केली. बालकांची चोरी करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.अफवांना बळी पडू नकाजिल्ह्यात लहान बालकांचे अपहरण करुन त्यांचे अवयव चोरी करुन नेणारी टोळी सक्रीय असल्याची केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात न घेता पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.