शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

प्रवासी विमानांनी येऊ शकते बिरसी विमानतळ नफ्यात

By admin | Updated: January 25, 2017 01:33 IST

गोंदियाजवळील बिरसी विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी सज्ज आहे. अगदी २४ तासाच्या पूर्वसुचनेवरून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो.

वर्षाला ९ कोटींचा तोटा : विमानसेवेसाठी राजकीय दबावाची गरज गोंदिया : गोंदियाजवळील बिरसी विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी सज्ज आहे. अगदी २४ तासाच्या पूर्वसुचनेवरून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो. प्रवासी विमानसेवा सुरू केल्यानंतरच हे विमानतळ नफ्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी जोर लावणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा बिरसी विमानतळाचे संचालक सुभाष प्रजापती यांनी व्यक्त केली. बिरसी विमानतळावर कोणतेही मोठे व्यावसायिक विमान उतरू शकेल अशी व्यवस्था आहे. तब्बल ३२०० मीटरची धावपट्टी आहे. नाईट लँडींगसह खराब हवामानातही विमान उतरू शकेल अशी व्यवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी विमानसेवा सुरू करणे गरजेचे झाले आहे. प्रजापती यांनी ते गोंदियात आल्यापासून विमानतळाच्या विकासासाठी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती पत्रपरिषदेत दिली. विशेषत: येथील प्रकल्पग्रस्त आणि सिक्युरिटी गार्डचा प्रश्न काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. त्याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, या ठिकाणी एकूण ६५ सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी विमानतळासाठी ४९ तर फाईंग अकादमीसाठी १६ गार्ड लागलेले आहेत. हे दोन्ही ठिकाणचे गार्ड आतापर्यंत दोन एजन्सीमार्फत ठेवले होते. नियमानुसार ९० टक्के गार्ड हे सरकारी सेवेतील माजिी कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत जे गार्ड येथे कार्यरत होते त्यात स्थानिक आणि अप्रशिक्षित गार्ड आहेत. त्यामुळे मी यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथून नव्याने झालेल्या निविदा प्रक्रियेनुसार गार्ड नियुक्त करण्याचा कंत्राट नवीन एजन्सीला देण्यात आला आहे. ही एजन्सी १ फेब्रुवारीपासून नवीन गार्ड नियुक्त करणार आहे. हे सर्व नियमानुसार होत असताना काही लोक जुन्याच गार्डला घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रजापती म्हणाले प्रकल्पग्रस्तांपैकी ज्या ३० लोकांनी कमी मोबदला मिळाल्याचे सांगत न्यायालयात प्रकरण दाखल केले होते त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार मोबदला दिला जाणार आहे. या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याची कोणतीही हमी आमच्या करारपत्रात नाही, असेही प्रतापती यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी) नाना पटोले विमानसेवेसाठी प्रयत्नशील बिरसी विमानतळावरील सोयी आणि प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबद्दल अधिकाऱ्यांनी खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी विमानसेवा सुरू करण्याबद्दल सकारात्मकता दाखवून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे राज्यातील ज्या १० शहरांचा विमानसेवेसाठी राज्य सरकार विचार करत आहे त्यात गोंदिया आहे. त्यामुळे लवकर ही सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.