शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

प्रवासी विमानांनी येऊ शकते बिरसी विमानतळ नफ्यात

By admin | Updated: January 25, 2017 01:33 IST

गोंदियाजवळील बिरसी विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी सज्ज आहे. अगदी २४ तासाच्या पूर्वसुचनेवरून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो.

वर्षाला ९ कोटींचा तोटा : विमानसेवेसाठी राजकीय दबावाची गरज गोंदिया : गोंदियाजवळील बिरसी विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी सज्ज आहे. अगदी २४ तासाच्या पूर्वसुचनेवरून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो. प्रवासी विमानसेवा सुरू केल्यानंतरच हे विमानतळ नफ्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी जोर लावणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा बिरसी विमानतळाचे संचालक सुभाष प्रजापती यांनी व्यक्त केली. बिरसी विमानतळावर कोणतेही मोठे व्यावसायिक विमान उतरू शकेल अशी व्यवस्था आहे. तब्बल ३२०० मीटरची धावपट्टी आहे. नाईट लँडींगसह खराब हवामानातही विमान उतरू शकेल अशी व्यवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी विमानसेवा सुरू करणे गरजेचे झाले आहे. प्रजापती यांनी ते गोंदियात आल्यापासून विमानतळाच्या विकासासाठी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती पत्रपरिषदेत दिली. विशेषत: येथील प्रकल्पग्रस्त आणि सिक्युरिटी गार्डचा प्रश्न काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. त्याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, या ठिकाणी एकूण ६५ सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी विमानतळासाठी ४९ तर फाईंग अकादमीसाठी १६ गार्ड लागलेले आहेत. हे दोन्ही ठिकाणचे गार्ड आतापर्यंत दोन एजन्सीमार्फत ठेवले होते. नियमानुसार ९० टक्के गार्ड हे सरकारी सेवेतील माजिी कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत जे गार्ड येथे कार्यरत होते त्यात स्थानिक आणि अप्रशिक्षित गार्ड आहेत. त्यामुळे मी यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथून नव्याने झालेल्या निविदा प्रक्रियेनुसार गार्ड नियुक्त करण्याचा कंत्राट नवीन एजन्सीला देण्यात आला आहे. ही एजन्सी १ फेब्रुवारीपासून नवीन गार्ड नियुक्त करणार आहे. हे सर्व नियमानुसार होत असताना काही लोक जुन्याच गार्डला घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रजापती म्हणाले प्रकल्पग्रस्तांपैकी ज्या ३० लोकांनी कमी मोबदला मिळाल्याचे सांगत न्यायालयात प्रकरण दाखल केले होते त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार मोबदला दिला जाणार आहे. या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याची कोणतीही हमी आमच्या करारपत्रात नाही, असेही प्रतापती यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी) नाना पटोले विमानसेवेसाठी प्रयत्नशील बिरसी विमानतळावरील सोयी आणि प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबद्दल अधिकाऱ्यांनी खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी विमानसेवा सुरू करण्याबद्दल सकारात्मकता दाखवून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे राज्यातील ज्या १० शहरांचा विमानसेवेसाठी राज्य सरकार विचार करत आहे त्यात गोंदिया आहे. त्यामुळे लवकर ही सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.