शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर, लोकलचे तिकीटदर तेच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

गोंदिया : तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा ...

गोंदिया : तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. या गाड्यांमध्ये तिकीट आरक्षित करून प्रवास करावा लागणार का, तिकीटदरात वाढ होणार का, असे अनेक प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाले होते. मात्र, रेल्वे विभागाने या गाड्यांचे तिकीट पूर्वीएवढेच राहणार असून आरक्षण न करताच स्थानकावरून तिकीट घेऊन प्रवास करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात शुक्रवारी पत्रक काढले आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून या गाड्या सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या सुरू असलेल्या मागणीला अखेर पूर्णविराम लागला आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वे विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यापासून सर्वच प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. मात्र, कालांतराने काही विशेष गाड्या सुरू केल्या. पण, पॅसेंजर आणि लोकलगाड्या सुरू केल्या नव्हत्या. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. शिवाय, गोरगरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तर, एसटीचे तिकीटदर हे दुप्पट असल्याने जवळच्या प्रवासासाठीसुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. त्यातच रेल्वेने विशेष गाड्यांचे तिकीटदर हे दुप्पट ठेवल्याने पॅसेंजर आणि लोकलच्या तिकीटदरात वाढ होतेय का, ही चिंता प्रवाशांना सतावत होती. तसेच विशेष गाड्यांमध्ये तिकीट आरक्षित करून प्रवास करता येत असल्याने हाच नियम लोकल पॅसेंजरसाठी लागू राहणार का, अशी चिंता सतावत होती. मात्र, शनिवारी (दि. २५) रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पॅसेंजर आणि लोकलगाड्यांच्या तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, असे सांगितले. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

.............

१६ रेल्वेस्थानकांवरील धूळ झटकणार

मागील १८ महिन्यांपासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील १६ रेल्वेस्थानके केवळ नाममात्र सुरू होते. गाड्याच सुरू नसल्याने रेल्वेस्थानकांवरील तिकीट खिडक्यांवरसुद्धा धूळ बसल्याचे चित्र होते. मात्र, मंगळवारपासून गाड्या सुरू होणार असल्याने ही धूळ झटकली जाणार आहे.

...............

विक्रेत्यांना दिलासा

लोकल आणि पॅसेंजर गाड्यांवर अनेक छोट्या विक्रेत्यांचा व्यवसाय अवंलबून आहे. या गाड्या बंद असल्याने त्यांचा रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. मात्र, शुक्रवारी रेल्वे विभागाने पॅसेंजर व लोकलगाड्या सुरू करण्याची घोषणा केल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.

.............