शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पॅसेंजर, लोकलचे तिकीटदर तेच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

गोंदिया : तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा ...

गोंदिया : तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. या गाड्यांमध्ये तिकीट आरक्षित करून प्रवास करावा लागणार का, तिकीटदरात वाढ होणार का, असे अनेक प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाले होते. मात्र, रेल्वे विभागाने या गाड्यांचे तिकीट पूर्वीएवढेच राहणार असून आरक्षण न करताच स्थानकावरून तिकीट घेऊन प्रवास करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात शुक्रवारी पत्रक काढले आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून या गाड्या सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या सुरू असलेल्या मागणीला अखेर पूर्णविराम लागला आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वे विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यापासून सर्वच प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. मात्र, कालांतराने काही विशेष गाड्या सुरू केल्या. पण, पॅसेंजर आणि लोकलगाड्या सुरू केल्या नव्हत्या. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. शिवाय, गोरगरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तर, एसटीचे तिकीटदर हे दुप्पट असल्याने जवळच्या प्रवासासाठीसुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. त्यातच रेल्वेने विशेष गाड्यांचे तिकीटदर हे दुप्पट ठेवल्याने पॅसेंजर आणि लोकलच्या तिकीटदरात वाढ होतेय का, ही चिंता प्रवाशांना सतावत होती. तसेच विशेष गाड्यांमध्ये तिकीट आरक्षित करून प्रवास करता येत असल्याने हाच नियम लोकल पॅसेंजरसाठी लागू राहणार का, अशी चिंता सतावत होती. मात्र, शनिवारी (दि. २५) रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पॅसेंजर आणि लोकलगाड्यांच्या तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, असे सांगितले. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

.............

१६ रेल्वेस्थानकांवरील धूळ झटकणार

मागील १८ महिन्यांपासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील १६ रेल्वेस्थानके केवळ नाममात्र सुरू होते. गाड्याच सुरू नसल्याने रेल्वेस्थानकांवरील तिकीट खिडक्यांवरसुद्धा धूळ बसल्याचे चित्र होते. मात्र, मंगळवारपासून गाड्या सुरू होणार असल्याने ही धूळ झटकली जाणार आहे.

...............

विक्रेत्यांना दिलासा

लोकल आणि पॅसेंजर गाड्यांवर अनेक छोट्या विक्रेत्यांचा व्यवसाय अवंलबून आहे. या गाड्या बंद असल्याने त्यांचा रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. मात्र, शुक्रवारी रेल्वे विभागाने पॅसेंजर व लोकलगाड्या सुरू करण्याची घोषणा केल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.

.............