शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी विमान वाहतूक सेवेला लवकरच प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

गोंदिया : गोंदिया येथील विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने असलेल्या दोन अडचणींवर लवकरात लवकर उपाय शोधून वाहतूक ...

गोंदिया : गोंदिया येथील विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने असलेल्या दोन अडचणींवर लवकरात लवकर उपाय शोधून वाहतूक सुरू करू व गोंदियाला राष्ट्राच्या सेवेत जोडू, असे केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार सुनील मेंढे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यामुळे लवकरच गोंदिया विमानतळावरून वाहतूक प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात खा. सुनील मेंढे यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील गोंदिया जिल्ह्यात असलेल्या विमानतळाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला थेट केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उत्तर देताना उडान अभिनय योजनेतंर्गत हवाई वाहतुकीसाठी सज्ज असलेले मात्र प्रत्यक्षात वाहतूक सुरू न झालेले किती विमानतळ देशात आहेत, वाहतूक सुरू करण्यासंदर्भात गोंदिया विमानतळाच्या परवानगीचा विषय केव्हापर्यंत पूर्ण होऊन प्रत्यक्ष वाहतूक सुरू होईल आणि गोंदिया विमानतळावरून मालवाहतुकीची व्यवस्था म्हणजेच कार्गो सेवा सुरू होणार आहे का, असा प्रश्न पुरवणी मागण्याच्या वेळी खासदार सुनील मेंढे यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देशात उडान योजने अंतर्गत ३७० हवाई मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात ३५९ मार्गांवर वाहतूक सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेअंतर्गत ५९ नवीन विमानतळे उभारण्यात आली असून देशातील एक एक नागरिक हवाई सफर करू शकेल असा कल्याणकारी विचार घेऊन ही योजना कार्यान्वित केली जात असल्याचे सांगितले.

.................

दोन अडचणी लवकरच दूर करणार

उडान नियोजित योजनेच्या चौथ्या टप्प्यात गोंदिया विमानतळावरून दोन चार्टर विमानांच्या माध्यमातून गोंदिया ते हैदराबाद आणि गोंदिया ते इंदोर अशा मार्गांवर वाहतूक केली जाणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीने सहमती दर्शविली आहे. मात्र सध्या दोन अडचणी या देत असून रनवे अँड सिक्युरिटी एरियासाठी जमीन हस्तांतरणाची गरज आहे. जून २०२१ भारतीय विमान वाहतूक महासंचालनालयाचे एक पथक जाऊन यासंदर्भात तपासणी करून आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. यासोबतच जो मार्ग निश्चित केला आहे त्या मार्गावर मध्यपासून उत्तर पूर्व भारतादरम्यान कंपनीकडे एकच विमान उपलब्ध आहे. हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावू. गोंदिया विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर मिळणारा प्रतिसाद पाहता चर्चा करून मालवाहतूक सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.