शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

पालकांनो, मुलांचे भविष्य उज्वल करूया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

अर्जुनी मोरगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळा व शिक्षणापासून दुरावला आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे तो पाहिजे ...

अर्जुनी मोरगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळा व शिक्षणापासून दुरावला आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे तो पाहिजे त्या प्रमाणात समाधानी दिसत नाही. कोरोनाच्या प्रभावाने सर्वांत जास्त नुकसान विद्यार्थीवर्गाचे झाले आहे. ते वाचन-लेखन विसरले आहेत. त्यांच्या मनावर निराशेची काजळी निर्माण झाली आहे. शासनाने १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यास हिरवी झेंडी दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावरील निराशेची काजळी झटकून पालकांनो, मुलांचे भविष्य उज्वल करूया, असे उद्गार प्राचार्य अनिल मंत्री यांनी व्यक्त केले.

सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आयोजित पालक शिक्षक सभा, शाळा व्यवस्थापन समिती व कोरोना नियंत्रण समिती यांच्या संयुक्त सभेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्राचार्य अनिल मंत्री, जे. एम. बी. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विना नानोटी, पर्यवेक्षिका छाया घाटे, आरोग्याधिकारी डॉ. अमोल जाधव यांची उपस्थिती होती. सभेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १५ जुलैपासून वर्ग ८ ते १२ चे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे, प्रत्यक्ष शाळा भरविण्याच्या दृष्टीने शाळेने केलेले नियोजन, ऑनलाइन वर्गातील पालकांचे अनुभव व चर्चा, पालक व विद्यार्थी यांनी शाळेत घ्यावयाची काळजी, संमतीपत्र, बससेवा, शाळा दोन सत्रांत भरविणे, वर्ग बारावीच्या निकालाचे काम सुरू असल्याने शिक्षक व्यस्त आहेत. म्हणून वर्ग उशिरा सुरू करणे यावर प्राचार्य अनिल मंत्री यांनी मार्गदर्शन केले. वरील सर्व ठराव पालकांनी एकमताने मंजूर करून शाळा सुरू करण्यासाठी संमती दर्शविली. लक्ष्मीकांत नाकाडे, मंजिरी भाकरे, अनिल हिरवे, शैलेश वालदे, ज्ञानेश कुंभारे, प्रतिभा भोंडे, भारती राऊत, अस्मिता वालदे यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आरोग्याधिकारी डॉ. अमोल जाधव व प्रा. टी. एस. बिसेन यांनी मार्गदर्शन केले. पालक शिक्षक समिती प्रमुख सुजित जक्कुलवार यांनीपालक शिक्षक समिती प्रमुख सुजित जक्कुलवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व आभार मानले.