शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पालक व विद्यार्थ्यांची बल्ले-बल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 10:08 PM

खासगी शाळा संचालकांकडून सुरू असलेल्या मनमर्जीवर आता अंकुश लागणार आहे. एनएसयुआयने या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देखासगी शाळांच्या मनमर्जीवर लागणार अंकुश : एनएसयुआयच्या उपोषणाचे फलीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खासगी शाळा संचालकांकडून सुरू असलेल्या मनमर्जीवर आता अंकुश लागणार आहे. एनएसयुआयने या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. परिणामी खासगी शाळांकडून पालकांची होणारी लूट आता थांबणार असल्याचे दिसते. यामुळे एनएसयुआयच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली असून पालक व विद्यार्थ्यांची ही बल्ले-बल्ले आहे.खासगी इंग्रजी व सीबीएसई शाळांकडून अवाढव्य शिक्षण शुल्क घेतले जात आहे. शिवाय वह्या-पुस्तके व गणवेशही जास्त दराने पालकांना तेथूनच घेण्याची सक्ती केली जाते. एकंदर खासगी शाळांकडून पालकांची मोठ्या प्रमाणात लूटच सुरू आहे. आज खासगी शाळांच्या मनमर्जी कारभारामुळे सामान्य व्यक्तीला आपल्या पाल्यांना शिकविणे अत्यंत कठीण झाले आहे. खासगी शाळांच्या या मनमर्जी विरोधात एनएसयुआय जिल्हाध्यक्ष हरिष तुळसकर यांनी आमरण तर त्यांच्या समर्थनार्थ पालकांनी गुरूवारपासून (दि.६) साखळी उपोषण सुरू केले होते. विशेष म्हणजे, त्यांच्या उपोषणाची दखल घेत शिक्षणाधिकाºयांनी शाळांच्या चौकशीचे पत्र त्यांना दिले होते. मात्र एवढ्यावरच समाधान न झाल्याने हे उपोषण सुरूच होते.या प्रकाराकडे लक्ष देत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मध्यस्थी करीत एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाला घेऊन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी एनएसयुआयच्या मागण्या मान्य करीत शिक्षणाधिकाºयांना कारवाईचे निर्देश दिले. आता जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिल्यामुळे शाळांची चौकशी होणार असून शाळांकडून सुरू असलेल्या मनमर्जीवर अंकुल लागणार असल्याचे दिसते. यामुळे पलाक वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.या आहेत प्रमुख मागण्याएनएसयुआयने चर्चे दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांना मागण्यांचे पत्र दिले आहे. त्यात, प्रत्येक खासगी शाळेत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरील अधिकाºयांच्या उपस्थितीत पालक-शिक्षक संघाचे गठन करावे, प्रत्येक शाळेत सभा घेवून पालक-शिक्षक संघाचे अधिकार व कायदे यांची माहिती द्यावी, शाळेत गणवेश, वह्या-पुस्तक व अन्य शैक्षणिक साहित्यांची विक्री बंद करून आदेशाचे पालन न करणाºयांवर कठोर कारवाई करा, शाळांकडून घेतले जाणारे शिक्षण शुल्क व कोणताही आर्थिक व्यवहार रसीद बुकवर व्हावा, विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणारे अनावश्यक विषय शिकविणे बंद करून त्यांचा मानसिक व दप्तरांतील पुस्तकांचा बोजा कमी करावा, सीबीएसई शाळांत फक्त एनसीईआरटीच्याच पुस्तकांचा वापर करून खासगी प्रक ाशनाच्या पुस्तकांचा वापर बंद करा, शिक्षकांची पात्रता तय करून शिक्षण विभागाकडून मान्य झाल्यावरच त्यांची नियुक्ती करावी, टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना शिकविण्याची मंजुरी द्यावी, सीबीएसईच्या नावावर सुरू असलेल्या शाळांचा व्यापार बंद करून कठोर कारवाई करावी, शाळांत विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही, मुलींसाठी प्रसाधनगृहात महिला कर्मचारीची व्यवस्था असावी, अनधिकृत १७ शाळांच्या संचालकांवर कारवाई करावी, लेट-फीस बंद करून शिक्षण शुल्क वसुल करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणे, अपमान करणे, स्पर्धांत भाग घेवू न देणे हे प्रकार बंद करावे, शाळांकडून विद्यार्थ्यांचा टिफीन मेन्यू निर्धारित केला जावू नये, प्रत्येकच शाळा मे व जून महिन्यात बंद असावी या मागण्यांचा समावेश आहे.लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगताआमदार अग्रवाल यांच्या मध्यस्थीनंतर जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेने हा प्रश्न सुटला. यामुळे पालक व कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण होते. परिणामी, आमदार अग्रवाल यांच्या हस्ते तुळसकर यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. याप्रसंगी आलोक मोहंती, गौरव वंजारी, संदीप ठाकूर, विन्नी गुलाटी, शिलू ठाकूर, दिपीका रूसे, श्वेता पुरोहित, सुनील तिवारी, पराग अग्रवाल, भागवत मेश्राम, पूजा तिवारी, ममता सोमवंशी, माही मक्कड, गीता सोमवंशी, सीमा बैस, छाया मेश्राम, मोसमी भालाधरे, रूपाली ठाकूर, सिनू राव, मयूर मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक व पालक उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल