शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

झाशीनगर योजना सुरु होण्यापूर्वीच पंप दुरुस्तीला ?

By admin | Updated: June 5, 2017 00:53 IST

प्रस्तावित झाशीनगर उपसा सिंचन योजनेला तब्बल २१ वर्षे पूर्ण झालीत. योजना अद्याप पूर्णत्वास आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रस्तावित झाशीनगर उपसा सिंचन योजनेला तब्बल २१ वर्षे पूर्ण झालीत. योजना अद्याप पूर्णत्वास आली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात एक थेंब सिंचनासाठी पाणी आले नाही. मात्र तत्पुर्वीच १० वर्षापूर्वी खरेदी केलेले योजनेचे पंप दुरुस्तीला आले आहेत. पंपाची चाचणी आता सुरु आहे. मग १० वर्षापूर्वी पंप खरेदीचे औचित्य हे न उलगडणारे आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी/दर्रे गावाजवळ इटियाडोह प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून झाशीनगर उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. या योजनेचा जब्बारखेडा, येरंडी, पवनी, कोहलगाव, धाबेटेकडी, जांभळी, चुटीया, कान्होली, तिडका, झाशीनगर, येलोडी व रामपूरी या १० गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेला १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. १९९६ ते २००२ या कालावधीत प्रकल्पावर अल्प तरतूद असल्याने प्रत्यक्ष कामांना २००२ मध्ये सुरुवात झाली. १९९६ ते २००२ मध्ये अल्प तरतूद असली तरी कामे का झाली नाहीत हे रहस्य आहे. २००२ ते २००८ या कालावधीत वनजमीन मान्यता व प्रत्यक्ष हस्तांतरण न झाल्यामुळे प्रकल्प रेंगाळल्याचे सांगितले जाते. २००८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कालवे, अंतर्गत रस्ते, पूल आदी कामांना प्राधान्य न देता साहित्य खरेदीची घाई संबंधित विभागाला झाली. ५०० अश्वशक्तीच्या २ व्हर्टीकल टर्बाईन पंपाची खरेदी करण्यात आली. या पंपाद्वारे १३६२ घमी/सेकंद निसर्गाने पाणी ३४-६४ मी. उंचीवर उपसा करुन सिंचनासाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेची काम अद्यापही सुरुच आहे. आता त्या पंपाची गरज भासत आहे. २००८ मध्ये खरेदी करुन धूळखात पडले असल्याने त्या पंपांचा वापर करता येणे शक्य नाही. त्यात आणखी काय बिघाड झाला हे अद्याप कळू शकले नाही.कंत्राटदाराला राजकीय वरदहस्तजिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी नवेगावबांध फिडरच्या लोकार्पणाचा सूतोवाच केला होता. प्रारंभी हा लोकार्पण सोहळा २० मे रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र याला प्रशासनाची संमती नव्हती. त्यानंतर २६ मे चा मुहूर्त निघाला. या कार्यक्रमाला ना.शिवतारे यांची वेळ घेण्यात आली होती. प्रशासनाची कसलीच तयारी झाली नाही मात्र लोकार्पणासाठी पालकमंत्र्यांचा अट्टाहास का? हे कोडेच आहे. झाशीनगर उपसा सिंचन योजनेंतर्गत झालेली कामे सुद्धा अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहेत. कंत्राटदाराला राजकीय वरदहस्त असल्याने तो अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे अधिकारीच दबक्या आवाजात सांगतात. या योजनेच्या कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.पंपाची जोडणी केली. ते पंप २००६-०७ मध्ये खरेदी केले होते. त्याची आॅईलींग करण्यासाठी नागपूरला पाठविण्यात आले. २ ते ४ दिवसात हे पंप येतील. त्यानंतर त्याची चाचणी घेण्यात येईल.अरविंद गेडामकार्यकारी अभियंता