शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शेतीच्या मजुरीचे दर निश्चित करणारी पांढराबोडी ग्रा.पं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

गोंदिया : सध्या खरिपातील शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याला मजुरीचा खर्च पुरत नाही, तर काही ठिकाणी मजुरांना जास्त ...

गोंदिया : सध्या खरिपातील शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याला मजुरीचा खर्च पुरत नाही, तर काही ठिकाणी मजुरांना जास्त वेळ शेतात राबविले जात आहे. या त्रासापासून मजूर आणि शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी जिल्ह्यातील पांढराबोडी ग्रामपंचायतीने एक अनोखा असा निर्णय घेतला आहे. नांगरणी, खारी खोदणे, रोहणीचे मजुरीचे दर निश्चित, कामाचा वेळाही निश्चित केल्या आहेत. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमधील कर्मचाऱ्याचे कामाचे तास व त्यांचे वेतन निश्चित असते, हे आपण नेहमी बघत असतो. मात्र, हेच नियम आता शेतमजुरांनाही लावण्यात आले आहेत. सरकारी काम असो वा खासगी काम, यामध्ये मजुरांचे शोषण आणि पिळवणूक होणारच, यात दुमत नाही. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील पांढराबोडी ग्रामपंचायतीने नवी शक्कल लढवत शेतमजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा आणि मजुरांनीही कामावर वेळेत यावे. यासाठी ग्रामपंचायतीने एक विशिष्ट ठराव घेत शेती मशागतीच्या कामाची निश्चित मजुरी ठरवून दिल्याने ती कामे करणाऱ्या मजुरांना आणि शेती मालकांना दिलासा दिला आहे. गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. खरिपाच्या हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी मजुरांचीही मागणी मोठी असते. तेव्हा आपली रोवणी आधी व्हावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते. दरम्यान, कमी- अधिक दर देऊन मजुरांची पळवापळवीसुद्धा होत असते. यामुळे मजुरांना शोषण आणि पिळवणुकीलासुद्धा सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे शेत मालकालादेखील अनेकदा जास्त पैसे मोजावे लागतात, यावर तोडगा म्हणून पांढराबोढी ग्रामपंचायतीने ठराव पारित करून गावात कोतवालांच्या माध्यमातून दवंडीदेखील दिली. शेतमजुरांना समान काम, समान मोबदला देण्यात यावा यासाठी निश्चित दरसुद्धा ठरवून दिले आहेत.

........

...असे आहेत दर आणि कामाच्या वेळा

दर व कामाची वेळ नांगरणीसाठी ७,५०० प्रतिमहिना, खारी खोदणाऱ्यासाठी ३०० रुपये, तर रोवणी लावणाऱ्या मजुरांसाठी १२० रुपये दिवस मजुरी देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत या कामाची वेळसुद्धा ठरवून दिली आहे. मजुरांनी वेळेवर कामावर यावे. एखादा मजूर शेतीच्या कामावर वेळेवर न पोहोचल्यास त्याची २० रुपये कपात करण्यात येणार आहे.

.......

नियमांचे उलंघन करणाऱ्याला दंड

ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या नियमांचे उलंघन करणाऱ्या शेतकऱ्याला दंडदेखील ठोठाविण्यात येणार आहे. सरकारी आणि खासगी कामाप्रमाणे शेतीच्या कामावर काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी ‘समान काम, समान वेतन’ असा पांढराबोडी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही राज्यात पहिली ग्रामपंचायत आहे.