शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

शेतीच्या मजुरीचे दर निश्चित करणारी पांढराबोडी ग्रा.पं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

गोंदिया : सध्या खरिपातील शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याला मजुरीचा खर्च पुरत नाही, तर काही ठिकाणी मजुरांना जास्त ...

गोंदिया : सध्या खरिपातील शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याला मजुरीचा खर्च पुरत नाही, तर काही ठिकाणी मजुरांना जास्त वेळ शेतात राबविले जात आहे. या त्रासापासून मजूर आणि शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी जिल्ह्यातील पांढराबोडी ग्रामपंचायतीने एक अनोखा असा निर्णय घेतला आहे. नांगरणी, खारी खोदणे, रोहणीचे मजुरीचे दर निश्चित, कामाचा वेळाही निश्चित केल्या आहेत. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमधील कर्मचाऱ्याचे कामाचे तास व त्यांचे वेतन निश्चित असते, हे आपण नेहमी बघत असतो. मात्र, हेच नियम आता शेतमजुरांनाही लावण्यात आले आहेत. सरकारी काम असो वा खासगी काम, यामध्ये मजुरांचे शोषण आणि पिळवणूक होणारच, यात दुमत नाही. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील पांढराबोडी ग्रामपंचायतीने नवी शक्कल लढवत शेतमजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा आणि मजुरांनीही कामावर वेळेत यावे. यासाठी ग्रामपंचायतीने एक विशिष्ट ठराव घेत शेती मशागतीच्या कामाची निश्चित मजुरी ठरवून दिल्याने ती कामे करणाऱ्या मजुरांना आणि शेती मालकांना दिलासा दिला आहे. गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. खरिपाच्या हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी मजुरांचीही मागणी मोठी असते. तेव्हा आपली रोवणी आधी व्हावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते. दरम्यान, कमी- अधिक दर देऊन मजुरांची पळवापळवीसुद्धा होत असते. यामुळे मजुरांना शोषण आणि पिळवणुकीलासुद्धा सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे शेत मालकालादेखील अनेकदा जास्त पैसे मोजावे लागतात, यावर तोडगा म्हणून पांढराबोढी ग्रामपंचायतीने ठराव पारित करून गावात कोतवालांच्या माध्यमातून दवंडीदेखील दिली. शेतमजुरांना समान काम, समान मोबदला देण्यात यावा यासाठी निश्चित दरसुद्धा ठरवून दिले आहेत.

........

...असे आहेत दर आणि कामाच्या वेळा

दर व कामाची वेळ नांगरणीसाठी ७,५०० प्रतिमहिना, खारी खोदणाऱ्यासाठी ३०० रुपये, तर रोवणी लावणाऱ्या मजुरांसाठी १२० रुपये दिवस मजुरी देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत या कामाची वेळसुद्धा ठरवून दिली आहे. मजुरांनी वेळेवर कामावर यावे. एखादा मजूर शेतीच्या कामावर वेळेवर न पोहोचल्यास त्याची २० रुपये कपात करण्यात येणार आहे.

.......

नियमांचे उलंघन करणाऱ्याला दंड

ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या नियमांचे उलंघन करणाऱ्या शेतकऱ्याला दंडदेखील ठोठाविण्यात येणार आहे. सरकारी आणि खासगी कामाप्रमाणे शेतीच्या कामावर काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी ‘समान काम, समान वेतन’ असा पांढराबोडी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही राज्यात पहिली ग्रामपंचायत आहे.