शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

शेतीच्या मजुरीचे दर निश्चित करणारी पांढराबोडी ग्रा.पं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

गोंदिया : सध्या खरिपातील शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याला मजुरीचा खर्च पुरत नाही, तर काही ठिकाणी मजुरांना जास्त ...

गोंदिया : सध्या खरिपातील शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याला मजुरीचा खर्च पुरत नाही, तर काही ठिकाणी मजुरांना जास्त वेळ शेतात राबविले जात आहे. या त्रासापासून मजूर आणि शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी जिल्ह्यातील पांढराबोडी ग्रामपंचायतीने एक अनोखा असा निर्णय घेतला आहे. नांगरणी, खारी खोदणे, रोहणीचे मजुरीचे दर निश्चित, कामाचा वेळाही निश्चित केल्या आहेत. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमधील कर्मचाऱ्याचे कामाचे तास व त्यांचे वेतन निश्चित असते, हे आपण नेहमी बघत असतो. मात्र, हेच नियम आता शेतमजुरांनाही लावण्यात आले आहेत. सरकारी काम असो वा खासगी काम, यामध्ये मजुरांचे शोषण आणि पिळवणूक होणारच, यात दुमत नाही. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील पांढराबोडी ग्रामपंचायतीने नवी शक्कल लढवत शेतमजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा आणि मजुरांनीही कामावर वेळेत यावे. यासाठी ग्रामपंचायतीने एक विशिष्ट ठराव घेत शेती मशागतीच्या कामाची निश्चित मजुरी ठरवून दिल्याने ती कामे करणाऱ्या मजुरांना आणि शेती मालकांना दिलासा दिला आहे. गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. खरिपाच्या हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी मजुरांचीही मागणी मोठी असते. तेव्हा आपली रोवणी आधी व्हावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते. दरम्यान, कमी- अधिक दर देऊन मजुरांची पळवापळवीसुद्धा होत असते. यामुळे मजुरांना शोषण आणि पिळवणुकीलासुद्धा सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे शेत मालकालादेखील अनेकदा जास्त पैसे मोजावे लागतात, यावर तोडगा म्हणून पांढराबोढी ग्रामपंचायतीने ठराव पारित करून गावात कोतवालांच्या माध्यमातून दवंडीदेखील दिली. शेतमजुरांना समान काम, समान मोबदला देण्यात यावा यासाठी निश्चित दरसुद्धा ठरवून दिले आहेत.

........

...असे आहेत दर आणि कामाच्या वेळा

दर व कामाची वेळ नांगरणीसाठी ७,५०० प्रतिमहिना, खारी खोदणाऱ्यासाठी ३०० रुपये, तर रोवणी लावणाऱ्या मजुरांसाठी १२० रुपये दिवस मजुरी देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत या कामाची वेळसुद्धा ठरवून दिली आहे. मजुरांनी वेळेवर कामावर यावे. एखादा मजूर शेतीच्या कामावर वेळेवर न पोहोचल्यास त्याची २० रुपये कपात करण्यात येणार आहे.

.......

नियमांचे उलंघन करणाऱ्याला दंड

ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या नियमांचे उलंघन करणाऱ्या शेतकऱ्याला दंडदेखील ठोठाविण्यात येणार आहे. सरकारी आणि खासगी कामाप्रमाणे शेतीच्या कामावर काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी ‘समान काम, समान वेतन’ असा पांढराबोडी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही राज्यात पहिली ग्रामपंचायत आहे.