शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर परिसर पावसासाठी आतूरलेलाच

By admin | Updated: July 21, 2015 01:25 IST

चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली. अवकाशात ढग

१७.६ मिमी पावसाची हजेरी : पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिलपालांदूर : चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली. अवकाशात ढग दाटून आले, गडगडाट सुरु झाला. जोरदार वर्षावाची आस लागली असतानाच आशा निराशेत बदलली. केवळ १७.६ मिमी पावसाची नोंद झाली. काल आठवडी बाजार असतांना पावसाची हजेरी पाहून शेतकऱ्यांसह मजुरांनी काही अंशी समाधान व्यक्त केले. अर्धा तास गर्दी जमली पण पाऊस थांबल्याने जैसे-थे सघडले.पालांदूर परिसरात कृषी विभागाच्या अंदाजानुसार ११७८४.४५ एकूण हेक्टरपैकी प्रत्यक्षात आवत्या १२७७ हेक्टर, रोवणी १२३०, पऱ्हे ९३७.६४ (नर्सरी), तूर ७४१, हळद १९.८, ऊस १९.९०, केळी ६.२०, भाजीपाला २८.३० इतर ४८.४० हेक्टरवर पिकांची लावगड केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धुळपेरणीस आंरभ झाला असून पावसाने ओढताण दिल्याने पिक संकटात आले आहे. चुलबंध नदीखोऱ्यात स्वतंत्र सिंचन क्षेत्रात ८० टक्के रोवणी आटोपली तर कोरडवाहू शेतीत केवळ १२ टक्के रोवणी उसनवारीवर झाली आहे. नदी, नाले, अजुनही कोरडेच आहेत. खर्चाची मर्यादा अतोनात वाढल्याने धान शेती पाण्याची सुध्दा परवडणारी राहिली नाही. पऱ्हे करपले असून कालचा पाऊस नर्सरीला जीवनदायिनी ठरला आहे. वेळ कमी असल्याने दुबारपेरणी न करता आहे त्यातच उरकवण्याचा विचार शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. ज्या ठिकाणी रोवणी करण्यात आली तिथे भेगा पडल्याने चिखलही कडक झाला आहे. यामुळे धानपिक जसा लावला तश्याच स्थितीत आहे. आता पाऊस आला ही तरी उत्पादनात निम्मा, पुरक अपेक्षीत आहे. मऱ्हेगाव फिडरवर पाणी आहे पण वीज नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन वर्षांचा दुष्काळ डोक्यावर असतांना पुढचे नियोजन करने शेतकऱ्याला अवघड झाले आहे. उत्साहपूर्वक शेती कसण्याची मानसिकता उरली नाही. कृषी केंद्रात खते, किटकनाशके पडून आहेत. मागणीच नसल्याने कृषी केंद्रधारकही व्यवसाय कसा राहिल, या विवंचनेत आहेत. उधारीचे प्रमाण वाढून नफयाची टक्केवारी कमी झाली. यामुळे जोडधंदा म्हणून हार्डवेअर, सिमेंट विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात मोठ्या पावसाची अपेक्षा दिसत नाही. परंतू आठवड्याभरात जर पावसाने जोरदार हजेरी लावली नाही तर रोवणी होणार नाही, असा शेतकऱ्यांचे म्हणने आहे. पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होईल. (वार्ताहर)