शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

आदिवासी महामंडळाचे धान खरेदी केंद्र पुन्हा बंद

By admin | Updated: November 17, 2014 22:55 IST

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ३५ धान खरेदी केंद्र महामंडळ व शासनाच्या जटील

देवरी : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ३५ धान खरेदी केंद्र महामंडळ व शासनाच्या जटील नियमांमुळे सोमवारपासून पुन्हा बंद झाले आहेत.शेतकऱ्यांचा धान हमीभावावर खरेदी करण्याकरिता धान खरेदी केंद्रांची निर्मिती करण्यात आली. मागील सन १९९१ पासून हे खरेदी केंद्र महामंडळाच्या नियमानुसार सुरू आहेत. परंतु यावर्षी शासनाच्या आदेशानुसार महामंडळ धान खरेदी केंद्रासोबत एक करारनामा करीत आहे. या करारनाम्यातील शर्ती व अटी फार जटील असल्यामुळे त्या सोसायटींना मान्य नाहीत. त्यामधील एक महत्वपूर्ण अट अशी आहे की, खरेदी केलेल्या मालात जी घट येईल ती घट अन्न व नागरी पुरवठा खात्याने घालून दिलेल्या निकष व मार्गदर्शक तत्वाच्या आधारे महामंडळ ठरवेल व मंजूर करेल व ती बंधनकारक राहील. परंतु त्यापेक्षा अवाजवी घट आल्यास त्या घटीची रक्कम संस्थेकडून वसुलीस पात्र राहील. ही रक्कम संस्थेच्या इतर मालमत्तेपासून वसूल करण्याचे व कपात करण्याचे अधिकार महामंडळास राहील, असेही त्यात नमूद आहे. या जटील अटीबद्दल सोसायटी मालकांनी सांगितले की, धान खरेदी केल्यानंतर १ ते २ वर्षापर्यंत महामंडळ त्याची उचल करीत नाही. त्यामुळे धानात घट निर्माण होते. ही घट महामंडळाच्या लापरवाहीमुळे होत असल्याने त्यास आम्ही जबाबदार कसे? तसेच महामंडळ धानाची उचल केव्हा व किती दिवसात करणार याबद्दल कोणतेच दीशानिर्देश सोसायट्यांना देण्यात आले नाहीत व तसे करारनाम्यात लिहिण्यातसुद्धा आले नाही. यामुळे शासन व महामंडळ सोसायट्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. त्यामुळे आम्ही आजपासून धान खरेदी केंद्र बंद केले आहे.यावर आदिवासी महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून आम्ही शासनाला कळवून धान खरेदी केंद्र सुरू केले. यावेळी शासनाच्या नियमानुसारच सोसायट्यांसोबत लिखित करारनामा करण्यात येत आहे. या करारनाम्यामुळे व नियम अटीविरुद्ध सोसायट्यांच्या संचालकांनी आक्षेप घेतला आहे. लवकरच यांची सभा बोलावून या समस्येवर तोडगा काढला जाईल व धान खरेदी केंद्र लवकरच सुरू होतील. (प्रतिनिधी)