शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सोमवारपासून धान खरेदी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

अर्जुनी मोरगाव : शासनाने भरडाईसाठी धानाची उचल केली नाही. खरीप हंगामाचा सुमारे अडीच लक्ष क्विंटल धान ४० गोदामात साठवलेला ...

अर्जुनी मोरगाव : शासनाने भरडाईसाठी धानाची उचल केली नाही. खरीप हंगामाचा सुमारे अडीच लक्ष क्विंटल धान ४० गोदामात साठवलेला आहे. परिणामतः रब्बी हंगामाच्या शेतमालाची खरेदी सुरू झाली नाही. गोदाम उपलब्ध झाल्याने येत्या सोमवारपासून धान खरेदी सुरू होईल, अशी माहिती तालुका खरेदी विक्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खरेदी विक्री समितीला सहा धान खरेदी केंद्र मंजूर आहेत. १ नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान खरीप हंगामातील १०२५६ शेतकऱ्यांकडून २ लक्ष ४१ हजार ९१ क्विंटल धानाची खरेदी समितीने केली. धान खरेदी केंद्राला संलग्न असलेल्या गावातील ४० गोदामात हा धानसाठा पूर्ण क्षमतेने ठेवला आहे. शासनाने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल न केल्यामुळे रब्बी हंगामाच्या धान खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्थेच्या मालकीचे एक गोदाम धानाने पूर्ण भरलेले आहे. संस्थेने स्वनिधीतून बांधकाम केलेले दुसरे गोदाम दोन वर्षांपूर्वीच भाड्याने दिले आहे. मागील दोन वर्षांपासून गोदामाची अडचण निर्माण झाली नाही.

शासनाने शाळा, समाज मंदिर तसेच इतर शासकीय इमारती उपलब्ध असल्यास त्याची माहिती मागितली आहे. त्यानुसार गोंदियाच्या जिल्हा पणन अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. काही धान खरेदी गोदाम उपलब्ध झाल्यामुळे संस्थेच्यावतीने सोमवारपासून खरेदी सुरू होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कापगते, उपाध्यक्ष केवळराम पुस्तोडे, संचालक चामेश्वर गहाणे, लैलेश शिवणकर उपस्थित होते.