शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

शेतकऱ्यांचे धान पीक जळले

By admin | Updated: April 25, 2016 01:34 IST

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १५०० हेक्टर क्षेत्रात धान पिके घेतली जात आहेत.

बंसोड यांनी केली पाहणी : अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व भारनियमन जबाबदारकाचेवानी : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १५०० हेक्टर क्षेत्रात धान पिके घेतली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि टेलवर असल्याने तसेच विद्युत विभागाच्या लोडशेंडिंगमुळे शेतकऱ्यांचे धान ऐनवेळी जळल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. माजी आमदार दिलीप बंसोड यांनी शेतात जाऊन धान पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. माजी आ. बंसोड यांनी २३ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजता मांडवी व खुरखुडी गावाच्या शेतात जावून प्रत्यक्ष धान पिकांची पाहणी केली. यावेळी भाऊलाल नागपुरे, विरचंद नागपुरे, अरूण रंगारी, दुर्गाप्रसाद नागपुरे, जगश्याम दमाहे, रामदास नागपुरे, बळीराम ढेंगे, घनश्याम दमाहे, शालीक ढेंगे, हरी ढेंगे, गोविंद दमाहे, लोकचंद बाभरे, अमरसिंह लिल्हारे, शेखर नागपुरे, सरपंच मुन्ना दमाहे उपस्थित होते. या सर्वांनी आपली जमीन व तेथील धानपिकांची समस्या दाखवली. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाले नसल्याने गर्भावस्थेत असणारा धान जळून खाक झालेला आहे. आता पाणी देण्यात आले किंवा मिळाले तरी त्या लोंबी बाहेर येणार नाही. आल्या तरी दाणे लागणार नाही, अशी समस्या मांडवी आणि खुरखुडी येथे अधिक प्रमाणात दिसून आली आहे. शेतातील धानपिकांची गत दाखविताना शेतकऱ्यांनी सांगितले, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे नियंत्रण व नियोजन नसल्याने टेलवर पाणी पोहचू शकत नाही. जर या अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाकडे लक्ष दिले असते, पाणी वाटपाचे नियोजन केले असते तर अशी गंभीर समस्या निर्माण झाली नसती. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाकडील बेलाटी आणि मुंडीपार कडील मायनरचे गेट काही शेतकरी बंद करतात. त्यामुळे मांडवी व खुरखुडीकडे जाणारे पाणी जात नाही, अशी गंभीर समस्या आहे. काही शेतात २० ते २५ दिवसांपासून पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे शेतातील धानपीक जळले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पी.एस. लांजेवार यांचे सहयोग व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे शेतकऱ्यांनी दिलीप बंसोड यांना सांगितले. पाणी वाटपाच्या कामावर कार्यालयाचे पाच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यात भेलावे, आर.एन. गौतम आणि सूर्यवंशी यांचा समावेश आहे. भेलावे आणि गौतम यांच्या निष्काळजीपणामुळे मांडवी आणि खुरखुडीकडे पाणी पोहोचत नसल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी पी.एस. लांजेवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न बंसोड यांनी केला. मात्र या अधिकऱ्याने फोन अटेंड केला नाही. यासंबंधी आपण अधिकाऱ्यांशी बोलणी करू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिला. आदल्या दिवशी लोकमतने शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत शनिवारी पाणी सुरू करण्यात आले होते. मात्र धान जळल्याने त्याचे अस्तित्व दिसून येत नाही. (वार्ताहर)आठ तास भारनियमनशेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी विद्युत वितरण कंपनी तेवढीच जबाबदार आहे. शेतकऱ्यांनी सांगितले, दुपारी ४ वाजतापासून रात्री १२ वाजतापर्यंत लोडशेंडिंग ठेवली जाते. त्यामुळे पुन्हा सुरू केले तर पाणी यायला चार तास लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणता उपाय करावा, हेच समजत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतात भरपूर पाण्याची गरज आहे. अशावेळी लोडशेंडिंग करणे शेतकऱ्यांचे हिताचे नसून आपण वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलणी करू, असे बन्सोड म्हणाले. रात्री १२ वाजतानंतर २ पंप सुरू केले जातात आणि दिवसा तीन पंप सुरू केले जातात, असे प्रकल्पाचे कर्मचारी सूर्यवंशी यांनी सांगितले. रोजंदारी कामगाराने शेतकऱ्यास मारले सालेबर्डी येथील रहिवासी व शेतकरी लोकचंद जागो बाभरे याला मायनर नं. ४ आर येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या चार कामगारांपैकी एकाने मारहाण केली. अमरसिंह माधोराव लिल्हारे व शेखर गजानन नागपुरे यांच्यासमोर (दि.२३) दुपारी २ वाजता मारपीट केली. मारणारे रोजंदारी कर्मचारी असून बेलाटी व कवलेवाडा येथील असल्याचे सांगितले. या वेळी माजी आ. दिलीप बंसोड यांनी आर.एन. गौतम यांना दूरध्वनीवरून मारपीट करणारा कामगार कोण? असे विचारले असता उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे बंसोड यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मारपीट करणाऱ्यांची तक्रार पोलिसांत देण्यात यावी, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.