शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे धान पीक जळले

By admin | Updated: April 25, 2016 01:34 IST

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १५०० हेक्टर क्षेत्रात धान पिके घेतली जात आहेत.

बंसोड यांनी केली पाहणी : अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व भारनियमन जबाबदारकाचेवानी : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १५०० हेक्टर क्षेत्रात धान पिके घेतली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि टेलवर असल्याने तसेच विद्युत विभागाच्या लोडशेंडिंगमुळे शेतकऱ्यांचे धान ऐनवेळी जळल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. माजी आमदार दिलीप बंसोड यांनी शेतात जाऊन धान पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. माजी आ. बंसोड यांनी २३ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजता मांडवी व खुरखुडी गावाच्या शेतात जावून प्रत्यक्ष धान पिकांची पाहणी केली. यावेळी भाऊलाल नागपुरे, विरचंद नागपुरे, अरूण रंगारी, दुर्गाप्रसाद नागपुरे, जगश्याम दमाहे, रामदास नागपुरे, बळीराम ढेंगे, घनश्याम दमाहे, शालीक ढेंगे, हरी ढेंगे, गोविंद दमाहे, लोकचंद बाभरे, अमरसिंह लिल्हारे, शेखर नागपुरे, सरपंच मुन्ना दमाहे उपस्थित होते. या सर्वांनी आपली जमीन व तेथील धानपिकांची समस्या दाखवली. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाले नसल्याने गर्भावस्थेत असणारा धान जळून खाक झालेला आहे. आता पाणी देण्यात आले किंवा मिळाले तरी त्या लोंबी बाहेर येणार नाही. आल्या तरी दाणे लागणार नाही, अशी समस्या मांडवी आणि खुरखुडी येथे अधिक प्रमाणात दिसून आली आहे. शेतातील धानपिकांची गत दाखविताना शेतकऱ्यांनी सांगितले, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे नियंत्रण व नियोजन नसल्याने टेलवर पाणी पोहचू शकत नाही. जर या अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाकडे लक्ष दिले असते, पाणी वाटपाचे नियोजन केले असते तर अशी गंभीर समस्या निर्माण झाली नसती. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाकडील बेलाटी आणि मुंडीपार कडील मायनरचे गेट काही शेतकरी बंद करतात. त्यामुळे मांडवी व खुरखुडीकडे जाणारे पाणी जात नाही, अशी गंभीर समस्या आहे. काही शेतात २० ते २५ दिवसांपासून पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे शेतातील धानपीक जळले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पी.एस. लांजेवार यांचे सहयोग व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे शेतकऱ्यांनी दिलीप बंसोड यांना सांगितले. पाणी वाटपाच्या कामावर कार्यालयाचे पाच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यात भेलावे, आर.एन. गौतम आणि सूर्यवंशी यांचा समावेश आहे. भेलावे आणि गौतम यांच्या निष्काळजीपणामुळे मांडवी आणि खुरखुडीकडे पाणी पोहोचत नसल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी पी.एस. लांजेवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न बंसोड यांनी केला. मात्र या अधिकऱ्याने फोन अटेंड केला नाही. यासंबंधी आपण अधिकाऱ्यांशी बोलणी करू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिला. आदल्या दिवशी लोकमतने शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत शनिवारी पाणी सुरू करण्यात आले होते. मात्र धान जळल्याने त्याचे अस्तित्व दिसून येत नाही. (वार्ताहर)आठ तास भारनियमनशेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी विद्युत वितरण कंपनी तेवढीच जबाबदार आहे. शेतकऱ्यांनी सांगितले, दुपारी ४ वाजतापासून रात्री १२ वाजतापर्यंत लोडशेंडिंग ठेवली जाते. त्यामुळे पुन्हा सुरू केले तर पाणी यायला चार तास लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणता उपाय करावा, हेच समजत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतात भरपूर पाण्याची गरज आहे. अशावेळी लोडशेंडिंग करणे शेतकऱ्यांचे हिताचे नसून आपण वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलणी करू, असे बन्सोड म्हणाले. रात्री १२ वाजतानंतर २ पंप सुरू केले जातात आणि दिवसा तीन पंप सुरू केले जातात, असे प्रकल्पाचे कर्मचारी सूर्यवंशी यांनी सांगितले. रोजंदारी कामगाराने शेतकऱ्यास मारले सालेबर्डी येथील रहिवासी व शेतकरी लोकचंद जागो बाभरे याला मायनर नं. ४ आर येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या चार कामगारांपैकी एकाने मारहाण केली. अमरसिंह माधोराव लिल्हारे व शेखर गजानन नागपुरे यांच्यासमोर (दि.२३) दुपारी २ वाजता मारपीट केली. मारणारे रोजंदारी कर्मचारी असून बेलाटी व कवलेवाडा येथील असल्याचे सांगितले. या वेळी माजी आ. दिलीप बंसोड यांनी आर.एन. गौतम यांना दूरध्वनीवरून मारपीट करणारा कामगार कोण? असे विचारले असता उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे बंसोड यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मारपीट करणाऱ्यांची तक्रार पोलिसांत देण्यात यावी, असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.