शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भातखाचरची कामे प्रगतीपथावर

By admin | Updated: March 4, 2017 00:09 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत (२०१६-१७) बोंडगावदेवीची गावाची निवड करण्यात आली आहे.

बोंडगावदेवी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत (२०१६-१७) बोंडगावदेवीची गावाची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लाभप्रद होतील अशी शेतीपयोगी विविध कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतामधील भातखाचराचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतशिवारामध्ये जाऊन भातखाचर कामांची पाहणी केली. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागामार्फत ठिकठिकाणी नाल्यातील पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्यात आले. नवनिर्मित बंधाऱ्यांनी ओलीताखालील शेतीचे क्षेत्र वाढले. बंधारा परिसरातील शेतीला जलसिंचनाची सोय उपलब्ध होऊन पिक उत्पादनात वाढ झाली. बंधारा बांधकामामुळे ठिकठिकाणी पाणी अडवून पाण्याच्या संचित साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली. मुबलक पाण्याच्या संचयाने शेतकऱ्यांना विविध पिके घेण्याची संधी प्राप्त झाली. जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतशिवार हिरव्यागार अलंकारांनी नटल्याचे चित्र दिसत आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतातील धुऱ्यांवर माती टाकणे, भातखाचर दुरूस्तीचे काम जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत करण्यात येत आहे. गावातील जवळपास ७० शेतकऱ्यांच्या ५० हेक्टर शेतीमध्ये भातखाचराचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदर कामांमुळे शेती समतल होऊन पाणी मुरण्यास सहज शक्य होणार आहे. शेतीच्या बांधावर माती टाकून धुरा (पार) बांधले जात आहे. भातखाचर दुरूस्तीच्या कामांनी शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांची बचत होऊन नव्याने माती टाकलेल्या धुऱ्यांवर मोठ्या प्रमाणात तुर, तिळाचे पिक घेणे सहज शक्य होणार आहे. जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरत आहे. येथील शेतशिवारात सुरू असलेल्या भातखाचर दुरूस्तीच्या कामाची पाहणी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक रुषी चांदेवार, कृषी सहायक मसराम यांनी करून शेतकऱ्यांना मौलीक सल्ला सुध्दा दिला. (वार्ताहर)