शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जुन्याची उचल होईना अन् नवीन खरेदी करता येईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 11:30 IST

Gondia News गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावरून उचल केलेल्या ३३ लाख ५० हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी राईस मिलर्सने अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे खरेदी केलेला धान तसाच गोदामात पडून आहे.

ठळक मुद्देरब्बीतील धान खरेदीवर संकट३३ क्विंटल धान गोदामातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावरून उचल केलेल्या ३३ लाख ५० हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी राईस मिलर्सने अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे खरेदी केलेला धान तसाच गोदामात पडून आहे. त्यातच आता मे महिन्यापासून रब्बीतील धान खरेदी सुरू करावी लागणार आहे, पण गोदामातील जुन्या धानाची उचल न झाल्याने नवीन रब्बीतील धानाची खरेदी करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने एकूण ११४ शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने ३३ लाख ५० हजार क्विंटल धानाची खरेदी केली. खरेदी केलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. पण धानाच्या भरडाई आणि वाहतुकीचे भाडे मागील दोन तीन वर्षांपासून थकीत आहे. तसेच धानाची गुणवत्ता चांगली नसल्याने भरडाई केल्यानंतर धानाची उतारी कमी येत आहे. त्यामुळे १ क्विंटल धानापासून शासनाला ६५ किलो तांदूळ देणे शक्य नाही. त्यामुळे राईस मिलर्सने यावर तोडगा काढण्याची विनंती शासनाला केली. पण शासनाने अद्यापही यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे राईस मिलर्सने भरडाईसाठी धानाची उचल केली नाही. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून खरेदी करण्यात आलेला ३३ लाख क्विंटल धान तसाच गोदामात पडून आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या समस्येत सुद्धा वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करण्याची वेळ आली तरी खरिपातील धानाची उचल न झाल्याने धान खरेदी करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या मनात नेमके काय ?

शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाच्या भरडाईला घेऊन राईस मिलर्स आणि शासन यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. पण शासनाने अद्यापही तोडगा काढला आहे. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे लाखो क्विंटल धान केवळ ताडपत्र्या झाकून पडला आहे. अवकाळी पाऊस झाल्यास तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यानंतरही कुठलेही पाऊल उचलले जात नसल्याने शासनाच्या मनात नेमके काय? असा सवाल केला जात आहे.

पुन्हा २०१० ची पुनर्रावृत्ती

यंदा निर्माण झाली तशीच परिस्थिती सन २०१० ते १०१३ या कालावधी निर्माण झाली होती. यामुळे लाखो क्विंटल धान खराब होऊन शासनाचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा सुद्धा पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात एक कोटी क्विंटल धान तसाच पडून आहे. या धानाची किमत कोेट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

बोनसची प्रतीक्षा

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपयेप्रमाणे ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्याची घाेषणा केली होती. याला जवळपास दीड लाख शेतकरी पात्र ठरले आहे. मात्र त्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :agricultureशेती