शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जुन्याची उचल होईना अन् नवीन खरेदी करता येईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 11:30 IST

Gondia News गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावरून उचल केलेल्या ३३ लाख ५० हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी राईस मिलर्सने अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे खरेदी केलेला धान तसाच गोदामात पडून आहे.

ठळक मुद्देरब्बीतील धान खरेदीवर संकट३३ क्विंटल धान गोदामातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावरून उचल केलेल्या ३३ लाख ५० हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी राईस मिलर्सने अद्यापही उचल केली नाही. त्यामुळे खरेदी केलेला धान तसाच गोदामात पडून आहे. त्यातच आता मे महिन्यापासून रब्बीतील धान खरेदी सुरू करावी लागणार आहे, पण गोदामातील जुन्या धानाची उचल न झाल्याने नवीन रब्बीतील धानाची खरेदी करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने एकूण ११४ शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने ३३ लाख ५० हजार क्विंटल धानाची खरेदी केली. खरेदी केलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. पण धानाच्या भरडाई आणि वाहतुकीचे भाडे मागील दोन तीन वर्षांपासून थकीत आहे. तसेच धानाची गुणवत्ता चांगली नसल्याने भरडाई केल्यानंतर धानाची उतारी कमी येत आहे. त्यामुळे १ क्विंटल धानापासून शासनाला ६५ किलो तांदूळ देणे शक्य नाही. त्यामुळे राईस मिलर्सने यावर तोडगा काढण्याची विनंती शासनाला केली. पण शासनाने अद्यापही यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे राईस मिलर्सने भरडाईसाठी धानाची उचल केली नाही. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून खरेदी करण्यात आलेला ३३ लाख क्विंटल धान तसाच गोदामात पडून आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या समस्येत सुद्धा वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करण्याची वेळ आली तरी खरिपातील धानाची उचल न झाल्याने धान खरेदी करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या मनात नेमके काय ?

शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाच्या भरडाईला घेऊन राईस मिलर्स आणि शासन यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. पण शासनाने अद्यापही तोडगा काढला आहे. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे लाखो क्विंटल धान केवळ ताडपत्र्या झाकून पडला आहे. अवकाळी पाऊस झाल्यास तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यानंतरही कुठलेही पाऊल उचलले जात नसल्याने शासनाच्या मनात नेमके काय? असा सवाल केला जात आहे.

पुन्हा २०१० ची पुनर्रावृत्ती

यंदा निर्माण झाली तशीच परिस्थिती सन २०१० ते १०१३ या कालावधी निर्माण झाली होती. यामुळे लाखो क्विंटल धान खराब होऊन शासनाचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा सुद्धा पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात एक कोटी क्विंटल धान तसाच पडून आहे. या धानाची किमत कोेट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

बोनसची प्रतीक्षा

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपयेप्रमाणे ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्याची घाेषणा केली होती. याला जवळपास दीड लाख शेतकरी पात्र ठरले आहे. मात्र त्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :agricultureशेती