शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातून पूरस्थितीवर मात

By admin | Updated: June 24, 2015 02:00 IST

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गोंदिया, भंडारा आणि मध्यप्रदेशातील शिवनी आणि बालाघाट जिल्ह्यातील सिंचन ...

जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचा पुढाकार : आंतरराज्य पूर नियंत्रण समितीची बैठकगोंदिया : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गोंदिया, भंडारा आणि मध्यप्रदेशातील शिवनी आणि बालाघाट जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी संबंधित चारही जिल्ह्यातील महसूल आणि सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर योग्य समन्वय ठेवून उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करावी, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आंतरराज्य पूर नियंत्रण समितीची बैठक सोमवार (दि.२२) बालाघाट (मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या वेळी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी बालाघाटचे जिल्हाधिकारी व्ही. किरण गोपाल, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, सिंचन प्रकल्पातून अतिवृष्टीच्या काळात पाणी सोडताना सिंचन विभागाने बाधित होणाऱ्या जिल्ह्यांना पूर्व कल्पना द्यावी. त्यामुळे हानी कमी होण्यास मदत होईल. नदीकाठावरील गावातील नागरिकांनासुध्दा पूर्वसूचना देऊन सतर्क करता येईल. सिंचन विभागाच्या आंतरराज्यीय अधिकाऱ्यांनी परस्परांशी या काळात योग्य समन्वय ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.बालाघाटचे जिल्हाधिकारी व्ही. किरण गोपाल म्हणाले, पूर परिस्थितीच्या काळात सिंचन व महसूल विभागाने अत्यंत सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे. ज्या प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते, त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. पूर परिस्थितीच्या काळात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असले पाहिजे. योग्य समन्वय व संपर्कातून पूर परिस्थितीवर मात करावी. पूर परिस्थिती उद्भवणारच नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, पूर परिस्थितीत वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीबाबतची माहिती संबंधित जिल्ह्यांना द्यावी, असेही ते म्हणाले. बैठकीला गोंदिया मध्यम प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता ए.एस. गेडाम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन.के.ढोरे, बाघ-इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही.जी. गोन्नाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, भंडारा मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चोपडे, शिवनीचे उपविभागीय अधिकारी के.सी. परते, बालाघाटचे उपविभागीय अधिकारी डी.एस. पटले, वाराशिवनीचे उपविभागीय अधिकारी के.बी. चौबे, लांजीचे उपविभागीय अधिकारी मेहताब सिंह, बालाघाटचे कार्यकारी अभियंता पी.के. मुदगल, सुभाष पटेल, सुनील व्यास, वाराशिवनीच्या तहसीलदार मिनाक्षी इंगळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) संजय सरोवरामुळे अनेक गावे प्रभावितमध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पूर परिस्थितीच्या काळात पाणी सोडल्यास बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील गावे प्रभावित होतात. पूर सदृश्य परिस्थितीच्या काळात सिंचन विभागाने महसूल विभागाला याची पूर्वकल्पना द्यावी. त्यामुळे बाधित गावातील नागरिकांना सतर्क करता येईल, असे जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले.