शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे

By admin | Updated: June 27, 2015 02:22 IST

धानाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने यावर्षीही बोनस दिला. एवढेच नाही तर दरवर्षी बोनस देऊन तो वाढवून देऊ, ...

गोंदिया : धानाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने यावर्षीही बोनस दिला. एवढेच नाही तर दरवर्षी बोनस देऊन तो वाढवून देऊ, असे सांगताना आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी रिकामी करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नागरा येथील मोहरानटोली मैदानावर भाजप उमेदवारांसाठी आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.विजय रहांगडाले, प्रदेश महामंत्री आंबटकर, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोटेकर, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ.डॉ.खुशाल बोपचे, केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, नेतराम कटरे, अशोक इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहेत हे सांगताना अनेक दाखले दिले. इंग्रजांच्या काळापासून ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई म्हणून शासनाची मदत मिळत होती. मात्र पहिल्यांदाच मोदी सरकारने ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्वठन पूर्वी ३ वर्षाकरिता केले जात होते. मात्र आमच्या सरकारने ते ५ वर्षाकरिता करून शेतकऱ्यांना कर्जात दिलासा दिला आहे. घोटाळे करणारे आदीच्या सरकारमधील नेते कोणत्या तोंडाने अच्छे दिन आले का? असा सवाल करतात, असे म्हणून लोकांचे तर अच्छे दिन येणार आहेच पण घोटाळेबाजांसाठी बुरे दिन आणल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना पिक विम्यातून नुकसानभरपाई मिळण्यासाठी वैयक्तिक पातळीवर नुकसानीची मोजणी करणारी यंत्रणा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गेली पाच वर्षे गोंदिया जिल्हा परिषद भाजपाकडे होती. पण राज्यात आणि केंद्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने सहकार्य केले नाही. पण आता पुन्हा भाजपाकडे जिल्हा परिषद देऊन विकासाची गाडी वेगाने दौडू द्या, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.यावेळी ना.राजकुमार बडोले यांनी निवडणूक आली की बाबासाहेब आठवणाऱ्या पक्षांवर टिका केली. खा.नाना पटोले यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या एका स्थानिक संचालकाकडून व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी खरेदी केंद्रात पोत्यांचा तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप केला. संचालन दीपक कदम यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)बोनस दरवर्षी सुरू राहावामुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना धान उत्पादकांना दरवर्षी बोनस सुरू राहावा, तसेच बोनसची रक्कम नवीन वर्षात २५० वरून वाढवून द्यावी आणि जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची अर्धवट असलेली कामे पूर्ण करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तो धागा पकडत बोनस कायम ठेवण्याची मागणी मान्य केली, मात्र आचारसंहितेमुळे यावर जास्त बोलणार नसल्याचे ते म्हणाले.पुराम दाम्पत्याची अनुपस्थिती खटकणारीआमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम आणि जि.प.सभापती सविता पुराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सभेला अनुपस्थिती अनेकांना खटकली. जिल्ह्यातील भाजपचे सर्व आजी-माजी आमदार आणि सभापती हजर असताना पुराम दाम्पत्य का अनुपस्थित होते हे कळू शकले नाही.