शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे

By admin | Updated: June 27, 2015 02:22 IST

धानाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने यावर्षीही बोनस दिला. एवढेच नाही तर दरवर्षी बोनस देऊन तो वाढवून देऊ, ...

गोंदिया : धानाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने यावर्षीही बोनस दिला. एवढेच नाही तर दरवर्षी बोनस देऊन तो वाढवून देऊ, असे सांगताना आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी रिकामी करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नागरा येथील मोहरानटोली मैदानावर भाजप उमेदवारांसाठी आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.विजय रहांगडाले, प्रदेश महामंत्री आंबटकर, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोटेकर, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ.डॉ.खुशाल बोपचे, केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, नेतराम कटरे, अशोक इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहेत हे सांगताना अनेक दाखले दिले. इंग्रजांच्या काळापासून ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई म्हणून शासनाची मदत मिळत होती. मात्र पहिल्यांदाच मोदी सरकारने ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्वठन पूर्वी ३ वर्षाकरिता केले जात होते. मात्र आमच्या सरकारने ते ५ वर्षाकरिता करून शेतकऱ्यांना कर्जात दिलासा दिला आहे. घोटाळे करणारे आदीच्या सरकारमधील नेते कोणत्या तोंडाने अच्छे दिन आले का? असा सवाल करतात, असे म्हणून लोकांचे तर अच्छे दिन येणार आहेच पण घोटाळेबाजांसाठी बुरे दिन आणल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना पिक विम्यातून नुकसानभरपाई मिळण्यासाठी वैयक्तिक पातळीवर नुकसानीची मोजणी करणारी यंत्रणा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गेली पाच वर्षे गोंदिया जिल्हा परिषद भाजपाकडे होती. पण राज्यात आणि केंद्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने सहकार्य केले नाही. पण आता पुन्हा भाजपाकडे जिल्हा परिषद देऊन विकासाची गाडी वेगाने दौडू द्या, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.यावेळी ना.राजकुमार बडोले यांनी निवडणूक आली की बाबासाहेब आठवणाऱ्या पक्षांवर टिका केली. खा.नाना पटोले यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या एका स्थानिक संचालकाकडून व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी खरेदी केंद्रात पोत्यांचा तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप केला. संचालन दीपक कदम यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)बोनस दरवर्षी सुरू राहावामुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना धान उत्पादकांना दरवर्षी बोनस सुरू राहावा, तसेच बोनसची रक्कम नवीन वर्षात २५० वरून वाढवून द्यावी आणि जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची अर्धवट असलेली कामे पूर्ण करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तो धागा पकडत बोनस कायम ठेवण्याची मागणी मान्य केली, मात्र आचारसंहितेमुळे यावर जास्त बोलणार नसल्याचे ते म्हणाले.पुराम दाम्पत्याची अनुपस्थिती खटकणारीआमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम आणि जि.प.सभापती सविता पुराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सभेला अनुपस्थिती अनेकांना खटकली. जिल्ह्यातील भाजपचे सर्व आजी-माजी आमदार आणि सभापती हजर असताना पुराम दाम्पत्य का अनुपस्थित होते हे कळू शकले नाही.