शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

अनाथ बालकाचा नाथ हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

अर्जुनी मोरगाव : ज्यांनी या जगात आणले, त्यांनीच वाळीत टाकले. अनाथालयात असताना बोलताही येत नव्हते तेव्हा ‘नाथ’ मिळाला. त्याने ...

अर्जुनी मोरगाव : ज्यांनी या जगात आणले, त्यांनीच वाळीत टाकले. अनाथालयात असताना बोलताही येत नव्हते तेव्हा ‘नाथ’ मिळाला. त्याने स्वीकारले. घरपण दिले. माझ्या भविष्याचे स्वप्न रंगवले. सारे काही सुरळीत असतानाच कोरोनाचा शिरकाव झाला. अन् त्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले. गोंदियाचे जिल्हाधिकारी सुद्धा तेवढेच भावुक. त्यांनीही साडी-चोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ देत त्या माउलीला जगण्याचे बळ दिले.

अर्जुनी मोरगावच्या सिव्हिल लाइन परिसरात सुनील येवले व कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या अनाथालयातून एक गोंडस बाळ स्वीकारले. ज्या बाळाला जगात कुणीही नाही. जन्मदात्यांनीच वाळीत टाकले. अशा निरागस बाळाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; पण हे हास्य क्षणभंगुर ठरले. सुनीलवर मे महिन्यात काळाने झडप घातली. कोरोनाच्या महामारीत त्याचे अकाली निधन झाले. त्याचे निरागस बाळासोबत रंगविलेले स्वप्न अधुरेच राहिले. त्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी ती माउली आहे खरी; पण कपाळावरचे कुंकू पुसल्याने तिचे अवसानच गळाले. काय करावे सुचेना. मात्र, प्रशासनातील एक अधिकारी एवढा संवेदनशील असू शकतो,

याचा प्रत्यय त्यावेळी आला, जेव्हा गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन येवले यांच्या घरासमोर थबकले. यादरम्यान घरासमोरून कितीतरी पाऊलं, वाहनं गेली असतील; पण ती थबकली नाहीत. आल्याआल्याच त्यांनी अगदी सामान्य माणसाप्रमाणे विचारपूस केली. अन्नधान्य विचारलं. चिमुकल्याच्या शिक्षणाचं विचारलं. रोजगाराची काय सोय आहे, तेही विचारलं. यापैकी काय हवंय का? त्याची आस्थेने विचारपूस केली. बहिणीला भावाकडून एक भेट म्हणून साडीचोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ आणले. त्याचा स्वीकार कर, असं अत्यंत भावुक होत बोलले. तिच्या डोळ्यांत दुखाश्रू-आनंदाश्रू तरळले. तिनं सुद्धा जिल्हाधिकारी भावाकडून भेटवस्तू स्वीकारल्या. त्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे राजेश खवले. त्यांनी तिला धीर दिला व जाताना मला माझ्या भावाने पाठवले आहे. माझे हे काम आहे, त्यात सहकार्य करा, असे सांगत तहसीलदारांकडे जाण्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

......

प्रशासनाची सहृदयता

कोरोनात कुणी पती-पत्नी, आई-वडील, मुले गमावली. त्यांच्याप्रति सहानुभूती बाळगणं हे सहृदयतेचं लक्षण आहे. नेमकी ही सहृदयता अर्जुनी मोरगाव तालुक्यात बघावयास मिळत आहे. येथील तहसीलदार विनोद मेश्राम हे स्वतः कोरोनात जीव गमावलेल्यांना साडीचोळी, पात्र लाभार्थींना कुटुंब अर्थसाहाय्य, मोफत अन्नधान्याचे रेशन कार्ड, निराधार योजनेचे लाभ मिळण्यासाठी त्यांच्या घरी भेटी देत आहेत. त्यांनी नुकतीच राजोली-भरनोली, मोरगाव, निमगाव, खामखुरा येथे भेट दिली. प्रशासनाची ही सहृदयता व संवेदना बघून सामान्यांनाही आपले कुणीतरी आहे, याचा प्रत्यय येत आहे.

............

शासनाने मदत द्यावी

कोरोना महामारीत अनेकांनी घरचे कर्ते पुरुष गमावले. होते नव्हते ते त्याच्या उपचारात खर्ची झाले. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. ज्यांना रोजगार नाहीत, त्यांनी भविष्याची वाटचाल कशी करायची हा यक्षप्रश्न आहे. एकतर कोरोना आजाराचे वेळी रुग्णालयात झालेला आर्थिक खर्च शासनाने द्यावा, ज्या कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शासनाने आर्थिक मदत करावी, अशी कोरोनामुळे जीव गमावलेल्या कुटुंबीयांची मागणी आहे.