शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अनाथ जयच्या वाट्याला ‘अंधार’

By admin | Updated: November 15, 2015 01:15 IST

ऐन दिवाळीच्या पूर्वी आपल्या पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या करणारा ४२ वर्षीय मेवा बनाफर याने मुलांवरुन ममतेची सावली हिरावून घेतली.

आजी-आजोबा पोरके : निराधार वृद्धांची दिवाळी अंधारातचविजय मानकर सालेकसाऐन दिवाळीच्या पूर्वी आपल्या पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या करणारा ४२ वर्षीय मेवा बनाफर याने मुलांवरुन ममतेची सावली हिरावून घेतली. आपल्या वृद्ध आई-वडिलांना पोरके करुन गेला. त्यामुळे मुलगा जय बनाफर याच्या भविष्याच्या वाटेवर अंधारच पसरलेला आहे. सत्तरी गाठणारे वृद्ध आई-वडील पोरके झाले आहेत. पुत्र वियोगात अश्रू वाहत असून दोन्ही म्हाताऱ्यांना आपले दु:ख आवरता आवरेना. अनाथ झालेल्या १३ वर्षीय जय याची दिवाळी अंधारात गेली आहे. तालुक्यातील कोटजमुरा येथील मेवा महावीर बनाफर (४२) याने ३० आॅक्टोबरला रात्री आपली पत्नी रेखा ऊर्फ पार्वती (४२) हिच्या सोबत भांडण करताना तिला यमसदनी पाठविले. एवढेच नाही तर स्वत:ला गळफास लावून स्वत:ही ईहलोकी गेला. त्यांनी हा सगळा प्रकार करीत असताना त्याच्या मुला-मुलीचा तसेच वृद्ध झालेल्या आई-वडिलांचा मुळीच विचार केला नाही. म्हाताऱ्या आई-वडिलांना भीक मागण्यापुरतीत सोडून गेला. मेवा बनाफरची व्यसनाधीनता या प्रकरणाचे मोठे कारण मानले जात आहे. जवळपास १६ वर्षापूर्वी मेवा बनाफर याचा मध्य प्रदेशातील मलाजखंड येथील पार्वती या मुलीशी लग्न झाला होता. काही दिवस व्यवस्थित संसार चालला. परंतु मेवा बनाफर हा कोणी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. त्याने पार्वतीला घटस्फोट दिला. आपल्या प्रेयसीला घेऊन तो नागपूर येथे राहू लागला. त्या दोघांची दोन अपत्ये झाली एक मुलगा आणि एक मुलगी. दुसरीकडे पार्वतीने ही दुसऱ्या पतीसोबत आपला संसार थाटला. आणि तीही एक मुलगी आणि एक मुलाची आई झाली. एवढ्यात मेवा बनाफरला दारू आणि गांजाची सवय लागली. अशात त्याच्या प्रेयसी पत्नीसोबत नेहमी भांडण होत होते. काही दिवसाने मेवाने तिला सोडले व गावी परतला. परंतु गावी आल्यावर त्याने आपल्या लग्नाची बायको पार्वती ऊर्फ रेखा हिच्याशी फोनवर संपर्क करू लागला. तिचा दुसरा पती नेहमी आजारी राहत असल्यामुळे कदाचित तीही कंटाळली होती. त्यामुळे ती सुद्धा मेवासोबत संपर्क करू लागली. दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. परंतु यात सर्वात मोठी अडचण होती ती पार्वतीच्या दोन मुलांची. तिने मेवासोबत येताना आपल्या मुला-मुलीला सोबत ठेवण्याची अट घातली. मेवाची त्यांना ठेवण्याची मुळीच इच्छा नव्हती. परंतु पार्वतीला प्राप्त करण्यासाठी त्याने मुला-मुलींना ठेवण्यास होकार दिला. काही दिवस सर्व ठीक चालले. परंतु ती मुले मेवाच्या नजरेत खटकत राहिली. अनेक वेळा त्याने मुला-मुलीला तिच्या माहेरी ठेवण्याचा सल्ला दिला, परंतु ती तयार नव्हती. यामुळे दोघांत भांडणं व्हायची. मेवा तिला प्रताडित करीत राहायचा. दारू-गांजा पिण्याची सवय असल्याने घरी नेहमी भांडणे. आर्थिक अडचणसुद्धा निर्माण होत होती. याच दरम्यान पार्वती एका शाळेत स्वयंपाक कामासाठी जायची. त्या पैशातून ती आपल्या लेकरांची गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु मेवा त्या पैशावरसुद्धा डोळा ठेवून राहायचा. त्यामुळेसुद्धा दोघात वाद व्हायचा. शेवटी पत्नीने दोन्ही लेकरांना आपल्या बहिणीच्या घरी नेऊन ठेवले. दोघांची शाळा सुटली आणि शिक्षण अर्धवट सुटले. इकडे दोन्ही पत्नी पुन्हा कोणत्या न कोणत्या कारणाने भांडण करीत होते. बसदेव समाजाचे असून याचा खानदानी व्यवसाय म्हणजे रोज सकाळी उठून ‘जय गंगा’ म्हणत भजन गाऊन घरोघरी भीक मागणे. त्यामुळे मेवाचे वडील आपल्या परंपरेच्या कामात व्यस्त होते. भांडणामुळे पार्वतीसुद्धा आपल्या बहिणीकडे मुला-मुलीसोबत राहू लागले. मेवाने तिला मारहाण करून यमसदनी धाडले.