शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

धम्म प्रसारासाठी धम्म मेळावे आयोजित करणे काळाची गरज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:27 IST

आमगाव : भारत ही बुद्धाची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारताकडे संपूर्ण जग अतिशय आदराने पाहत आहे. बुद्धाने ...

आमगाव : भारत ही बुद्धाची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारताकडे संपूर्ण जग अतिशय आदराने पाहत आहे. बुद्धाने आपल्या सर्वस्वाचा त्याग करून समता, स्वातंत्र्य, बंधुता, मैत्री व करुणेचा जगाला महामंत्र दिला. हा महामंत्र जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी व धम्माचा प्रसार करण्यासाठी धम्म मेळावे आयोजित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे यांनी केले.

तालुक्यातील ग्राम तिगाव येथील सम्राट अशोक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जेतवन बुद्धभूमी परिसरात आयोजित जिल्हास्तरीय बौद्ध धम्म संमेलनात अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन भदन्त श्रद्धाबोधी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, माजी सभापती हनुवंत वट्टी, माजी सदस्य अशोक पटले, प्राचार्य महेंद्र मेश्राम, व्यवसायी शंकर भोवते, सामाजिक कार्यकर्ता प्यारेलाल जांभूळकर, चैतराम शेंडे, एल.बी. मेश्राम, मनोहर डोंगरे, हेमलता डोंगरे, आकाश गणवीर, रवींद्र नागपुरे, नमिता बघेले, समितीच्या अध्यक्ष कमला डोंगरे, सचिव निशा मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी श्रद्धाबोधी महाथेरो, प्राचार्य टेंभुर्णे व मान्यवरांच्या हस्ते समाजभवन व वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महाथेरो यांनी, ‘बुद्ध धम्म व त्याचे आचरण’ या विषयावर धम्म बांधवांना धम्मदेशना केली. मेंढे यांनी, माणसा-माणसांत मैत्री निर्माण करण्यासाठी व संस्कारशील समाज घडविण्यासाठी बुद्धाच्या विचारांची व धम्माची गरज असल्याचे सांगून समाजभवन व वाचनालयाच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समितीच्या सचिव मेश्राम यांनी मांडले. संचालन संजू बोपचे यांनी केले. आभार मोहम्मद रफिक शेख यांनी मानले. कार्यक्रमासाठी शकुंतला टेंभुर्णीकर, छाया डोंगरे, आशा मेश्राम, सुनीता राऊत, कांता राहुलकर, किरण टेंभुर्णीकर, कविता टेंभुर्णीकर, गीता नंदेश्वर, शीला मेश्राम, नलू मेश्राम, सुगरता जांभूळकर, ममता नंदा गवळी, संध्या घरडे, अनिता डोंगरे, पंचफुला राऊत, मीरा डोंगरे, नलिना नंदेश्वर व महिला कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.