शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

निर्माल्यापासून तयार करणार सेंद्रीय खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:28 IST

गणेश व दुर्गात्सवादरम्यान गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला होता. यासाठी या विभागाने मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा केले.

ठळक मुद्देविविध मंडळांकडून गोळा केले निर्माल्य : सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गणेश व दुर्गात्सवादरम्यान गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला होता. यासाठी या विभागाने मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा केले. मंडळाच्या पदाधिकाºयांनी यावर्षी स्वयंस्फुर्तीने निर्माल्य सामाजिक वनीकरण विभागाच्या स्वाधिन केले. त्यामुळे या विभागाच्या कार्याला देखील हातभार लावण्यास मदत झाली.राज्यभरात गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. गोंदिया येथे मागील सहा वर्षांपासून दुर्गा उत्सवादरम्यान भाविकांनी वाहिलेले पूजेचे साहित्य, फुले, निंबू आदी निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता ते जमिनीत पुरून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरणपूरक जागरूकता दाखवून गोंदिया येथे निर्माल्य रथाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निर्माल्य रथात फूलहार, निंबू, नारळ बूच आदि साहित्य निर्माण रथात अर्पण करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मीनगर, कन्हारटोली, पूनाटोली, रेलटोली, इंगळे चौक, गोविंदपूर, गांधी प्रतिमा, मनोहर चौक, चांदणी चौक, मामा चौक, शंकर चौक, वाजपेयी वार्ड, सावराटोली, हेमू कॉलनी चौक, श्री टॉकिज, कुंभारटोली, बजाज वार्ड व इतर दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देवून निर्माल्य जमा करण्यात आले. निर्माल्य रथ दुर्गा उत्सव मंडळासमोर पोहोचताच मंडळातील उत्साही सदस्य त्वरित एकत्र आले.स्वत:हून वाहनापर्यंत निर्माल्य आणून देत सामाजिक वनीकरण विभागाच्या मोहिमेला सहकार्य केले. यावरून शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षापासून पर्यावरणपूरक मंडप सजावट करणाºया मंडळाचा सत्कार करण्यात येतो.यावर्षी श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव समिती मामा चौक गोंदिया (नानू मुदलियार) व सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ कुंभारटोली मालवीय वार्ड (खोब्रागडे) यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक देण्यात आला. विशेष म्हणजे निर्माल्यापासून तयार होणारे सेंद्रीय खताचे गरजू शेतकºयांना वाटप करण्यात येणार आहे.निर्माल्य दानातून टाळली पर्यावरणाची हानीपर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी दुर्गा उत्सवादरम्यान भाविकांनी वाहिलेले पूजेचे साहित्य, फूल मूर्तीसोबत पाण्यात विसर्जित केल्यास तेथील पाणी प्रदूषित होते. पर्यायाने पर्यावरणाची हानी होते. हे टाळण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, वनविभागाच्या वतीने निर्माल्य रथ फिरविण्यात आला. निर्माल्य रथ शहरात विविध ठिकाणी फिरवून निर्माल्य गोळा करण्यात आले. या कार्यात नर्मदा सेवा संस्थेचे माधव गारसे, स्वामी विवेकानंद हायस्कूल कारंजा येथील हरित सेना प्रभारी शिक्षक कृष्णकांत बिसेन आदींनी पुढाकार घेतला व मागील सहा वर्षांपासून सुरू असलेले निर्माल्य रथ अखंड सुरू ठेवले.२९ मंडळांचा पुढाकारगोंदियातील २९ मंडळांकडून निर्माल्य जमा करण्यात आले. यात एक गाडी निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांच्या बंगल्यासमोरील रोपवन क्षेत्रात खड्डा खोदून त्यात टाकण्यात आले. त्यात दुसºया पॉलिथिनही ठेवण्यात आल्या. या खड्ड्यातील निर्माल्याचे कंपोष्ट होवून पुढील हंगामात ते खत रोपे निर्माण करण्याच्या कार्यात उपयोगी येणार आहे, असे सामाजिक वनीकरण अधिकारी युवराज कुंभलकर यांनी सांगितले.