शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:18 IST

कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : कमीतकमी कीटकनाशक व रासायनिक खताचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शेतातील उत्पादित मालातून दररोजच्या आहारात काही प्रमाणात विष खाण्यात येत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचे धोके ओळखून शेतकºयांनी आता विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.अलिकडेच यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांचा शेतात वापर करताना झालेल्या विषबाधेतून काही शेतकºयांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कृषी केंद्र संघाच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एम. चौरागडे, कृषी उपसंचालक अश्विनी भोपळे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदिकशोर नायनवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्ह्यात भातपीक हे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असल्याचे सांगून काळे म्हणाले, भात पिकावर खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे, करपा यासारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिफारशीपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते.तसेच निष्काळजीपणे कीटकनाशकांची हाताळणी केल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात. कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्याकरिता अनेक जैविक कीटकनाशके, मित्रकीड संशोधित झालेल्या असून त्यांचा योग्य त्या वेळी वापर केल्यास अत्यंत कमी खर्चात कीड रोगावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच जमिनीचे आरोग्य, पिकांची गुणवत्ता व शेतकºयांचे आरोग्यसुध्दा सुदृढ ठेवता येईल, असे ते म्हणाले.भात पिकाकरिता विविध कीडरोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम (खोडकिड्याकरिता), मेट्राहायसिअन निसोएमी (तुडतुड्याकरिता), कामगंध सापळे इत्यादीसारख्या जैविक नियंत्रकांचा वापर करावा. याशिवाय बेडूक संवर्धन केल्यास भातशेतीमध्ये खोडकिडा नियंत्रणाकरिता अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्याचे संवर्धन देखील जिल्ह्याातील शेतकºयांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी केले.यावेळी कृषी केंद्र संघटनेचे नितीन गुप्ता, अशोक गुप्ता, महेश पाचे, श्रीराम चंदानी, रामअवतार अग्रवाल, शैलेश जैन व राहुल सिंघानिया उपस्थित होते.फवारणीवेळी काळजी घ्याजिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात कमीत कमी कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर होईल. तसेच फवारणीबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा प्रचार-प्रसार कृषी सहायकांनी करावा. माय पोर्टलवरु न जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना कीटकनाशकांच्या वापराबाबत मोबाईलवर संदेश पाठवावे. आज कीटकनाशकांचा वापर शेतकºयांच्या जीवावर बेतला आहे, हे यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून लक्षात येते. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मित्रकिडीचा मोठ्या प्रमाणात नायनाट होत असल्याचे त्यांनी सांगितले.