शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:18 IST

कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : कमीतकमी कीटकनाशक व रासायनिक खताचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शेतातील उत्पादित मालातून दररोजच्या आहारात काही प्रमाणात विष खाण्यात येत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचे धोके ओळखून शेतकºयांनी आता विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.अलिकडेच यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांचा शेतात वापर करताना झालेल्या विषबाधेतून काही शेतकºयांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कृषी केंद्र संघाच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एम. चौरागडे, कृषी उपसंचालक अश्विनी भोपळे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदिकशोर नायनवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्ह्यात भातपीक हे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असल्याचे सांगून काळे म्हणाले, भात पिकावर खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे, करपा यासारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिफारशीपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते.तसेच निष्काळजीपणे कीटकनाशकांची हाताळणी केल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात. कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्याकरिता अनेक जैविक कीटकनाशके, मित्रकीड संशोधित झालेल्या असून त्यांचा योग्य त्या वेळी वापर केल्यास अत्यंत कमी खर्चात कीड रोगावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच जमिनीचे आरोग्य, पिकांची गुणवत्ता व शेतकºयांचे आरोग्यसुध्दा सुदृढ ठेवता येईल, असे ते म्हणाले.भात पिकाकरिता विविध कीडरोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम (खोडकिड्याकरिता), मेट्राहायसिअन निसोएमी (तुडतुड्याकरिता), कामगंध सापळे इत्यादीसारख्या जैविक नियंत्रकांचा वापर करावा. याशिवाय बेडूक संवर्धन केल्यास भातशेतीमध्ये खोडकिडा नियंत्रणाकरिता अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्याचे संवर्धन देखील जिल्ह्याातील शेतकºयांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी केले.यावेळी कृषी केंद्र संघटनेचे नितीन गुप्ता, अशोक गुप्ता, महेश पाचे, श्रीराम चंदानी, रामअवतार अग्रवाल, शैलेश जैन व राहुल सिंघानिया उपस्थित होते.फवारणीवेळी काळजी घ्याजिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात कमीत कमी कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर होईल. तसेच फवारणीबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा प्रचार-प्रसार कृषी सहायकांनी करावा. माय पोर्टलवरु न जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना कीटकनाशकांच्या वापराबाबत मोबाईलवर संदेश पाठवावे. आज कीटकनाशकांचा वापर शेतकºयांच्या जीवावर बेतला आहे, हे यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून लक्षात येते. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मित्रकिडीचा मोठ्या प्रमाणात नायनाट होत असल्याचे त्यांनी सांगितले.