शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

आरोग्य वर्धनासाठी सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 20:36 IST

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उत्पादन वाढत असले तरी शेतजमिनीची सुपीकता कमी होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे यांचे आवाहन : बांधावर शेतकºयांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उत्पादन वाढत असले तरी शेतजमिनीची सुपीकता कमी होते. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत निकृष्ट होऊन उत्पादनशक्ती कमी होते. विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. नाइलाजाने शेतकरी हवालदिल होतो. शेतकºयांच्या घरामध्ये आनंदीमय वातावरण निर्मितीसाठी तसेच शेती उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरुन स्वत:चा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्यावतीने ‘एक दिवस शेतकºयांच्या बांधावर’ प्रत्यक्ष भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शेतकºयांशी हितगूज करतांना ते बोलत होते. कृषी विभागामार्फत शेतकºयांसाठी राबविण्यात येणाºया शेत शाळा, सेंद्रीय शेती, यांत्रिकी पद्धतीने भात लागवड, शेतकरी उत्पादक कंपनी आदीचा आढावा घेण्याकरिता तसेच शेतकºयांशी प्रत्यक्ष बांधावर जावून हितगूज साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रकल्प संचालक आत्मा हिंदुराव चव्हाण, तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, संग्रामे उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी काळे यांनी बुधेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांशी चर्चा केली. यात रोवणी यंत्राद्वारे भात लागवड व व्यवस्थापन या विषयावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. शेती शाळेत रोवणी यंत्राद्वारे भात लागवडीचे फायदे शेतकºयांना कशाप्रकारे झाले, परंपरागत व रोवणी यंत्राद्वारे रोवणी यांच्यातील फरक याबाबत शेतकºयांकडून जिल्हाधिकाºयांनी माहिती जाणून घेतली. अशोक लंजे यांच्या शेतात जावून रोवणी यंत्राद्वारे रोवणी केलेल्या धान पिकाची पाहणी जिल्हाधिकाºयांनी केली. नंतर बोंडगावदेवी येथील शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकरी, सेंद्रिय शेती करणारे , रोवणी यंत्राद्वारे भात लागवड करणाºया शेतकºयांच्या सभेत जिल्हाधिकारी काळे यांनी शेती संदर्भातील समस्या, शेतकरी आत्मसात करीत असलेले शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, रोवणी यंत्राचे भात शेतीस झालेले फायदे व समस्या, सेंद्रिय शेती प्रकल्प राबविणाºया शेतकºयांना झालेला फायदा व काही अडचणी याविषयी माहिती दिली. पाहणीत हिरालाल बोरकर यांच्या शेतास भेट दिली. रोवणी यंत्राद्वारे रोवणी केलेल्या शेताची प्रत्यक्षात पाहणी केली. कुकसु मेश्राम यांच्या शेतातील सेंद्रिय शेतीस भेट देवून हळद लागवड, चवळी लागवड व रोवणी यंत्राद्वारे करण्यात आलेल्या भात लागवडीची पाहणी केली. चान्ना/बाक्टी येथील कंपनीच्या भात गिरणी प्रकल्पात आलेल्या भात लागवडीची पाहणी केली. चान्ना/बाक्टी येथील कंपनीच्या भात गिरणी प्रकल्पास भेट दिली. कान्होली येथील नवेगावबांध तलाव पाणलोट क्षेत्रातील सेंद्रिय शेती प्रकल्पाची पाहणी केली. कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय तर्फे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, स.व्य.जी.आर. चचाणे, एस.एन. बोचरे, चिंतामन मसराम, भोजराज नखाते यांनी सहकार्य केले.