शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

आरोग्य वर्धनासाठी सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 20:36 IST

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उत्पादन वाढत असले तरी शेतजमिनीची सुपीकता कमी होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे यांचे आवाहन : बांधावर शेतकºयांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उत्पादन वाढत असले तरी शेतजमिनीची सुपीकता कमी होते. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत निकृष्ट होऊन उत्पादनशक्ती कमी होते. विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. नाइलाजाने शेतकरी हवालदिल होतो. शेतकºयांच्या घरामध्ये आनंदीमय वातावरण निर्मितीसाठी तसेच शेती उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरुन स्वत:चा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्यावतीने ‘एक दिवस शेतकºयांच्या बांधावर’ प्रत्यक्ष भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शेतकºयांशी हितगूज करतांना ते बोलत होते. कृषी विभागामार्फत शेतकºयांसाठी राबविण्यात येणाºया शेत शाळा, सेंद्रीय शेती, यांत्रिकी पद्धतीने भात लागवड, शेतकरी उत्पादक कंपनी आदीचा आढावा घेण्याकरिता तसेच शेतकºयांशी प्रत्यक्ष बांधावर जावून हितगूज साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रकल्प संचालक आत्मा हिंदुराव चव्हाण, तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, संग्रामे उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी काळे यांनी बुधेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांशी चर्चा केली. यात रोवणी यंत्राद्वारे भात लागवड व व्यवस्थापन या विषयावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. शेती शाळेत रोवणी यंत्राद्वारे भात लागवडीचे फायदे शेतकºयांना कशाप्रकारे झाले, परंपरागत व रोवणी यंत्राद्वारे रोवणी यांच्यातील फरक याबाबत शेतकºयांकडून जिल्हाधिकाºयांनी माहिती जाणून घेतली. अशोक लंजे यांच्या शेतात जावून रोवणी यंत्राद्वारे रोवणी केलेल्या धान पिकाची पाहणी जिल्हाधिकाºयांनी केली. नंतर बोंडगावदेवी येथील शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकरी, सेंद्रिय शेती करणारे , रोवणी यंत्राद्वारे भात लागवड करणाºया शेतकºयांच्या सभेत जिल्हाधिकारी काळे यांनी शेती संदर्भातील समस्या, शेतकरी आत्मसात करीत असलेले शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, रोवणी यंत्राचे भात शेतीस झालेले फायदे व समस्या, सेंद्रिय शेती प्रकल्प राबविणाºया शेतकºयांना झालेला फायदा व काही अडचणी याविषयी माहिती दिली. पाहणीत हिरालाल बोरकर यांच्या शेतास भेट दिली. रोवणी यंत्राद्वारे रोवणी केलेल्या शेताची प्रत्यक्षात पाहणी केली. कुकसु मेश्राम यांच्या शेतातील सेंद्रिय शेतीस भेट देवून हळद लागवड, चवळी लागवड व रोवणी यंत्राद्वारे करण्यात आलेल्या भात लागवडीची पाहणी केली. चान्ना/बाक्टी येथील कंपनीच्या भात गिरणी प्रकल्पात आलेल्या भात लागवडीची पाहणी केली. चान्ना/बाक्टी येथील कंपनीच्या भात गिरणी प्रकल्पास भेट दिली. कान्होली येथील नवेगावबांध तलाव पाणलोट क्षेत्रातील सेंद्रिय शेती प्रकल्पाची पाहणी केली. कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय तर्फे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, स.व्य.जी.आर. चचाणे, एस.एन. बोचरे, चिंतामन मसराम, भोजराज नखाते यांनी सहकार्य केले.