शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

सेंद्रीय शेती लाभप्रद व आरोग्यवर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 01:00 IST

आजघडीला शेतीमधून पिकाचे उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा व किटकनाशक औषधांचा वापर केला जातो.

कृषी अधिकारी तुमडाम : सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण बोंडगावदेवी : आजघडीला शेतीमधून पिकाचे उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा व किटकनाशक औषधांचा वापर केला जातो. यापासून उत्पादनात जरी वाढ होत असली तरी मात्र त्याप्रमाणात हातामध्ये पैसा येत नाही. उत्पादीत मालाच्या आहारापासून मानवी जीवनाला अनेक व्याधीला सामोरा जावे लागते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. येथील स्वर्गीय सुनिल बहुउद्देशिय स्वयंसहायता शेतकरी बचत गटाच्या वतीने प्रगतशील शेतकरी कुसन झोळे यांच्या शेडनेट असलेल्या शेतामध्ये आयोजित ५० शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम होते. ते पुढे म्हणाले, पुढील आयुष्य निरोगी सुखकर जाण्याबरोबरच जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी सेंद्रीय शेतीकरुन पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवानी आता पुढे येणे काळाची गरज आहे.मार्गदर्शक म्हणूनकृषी मंडळ अधिकारी संजय रामटेके, अर्जुनी-मोरगावचे मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक ऋषी चांदेवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे उपस्थित होते. याप्रसंगीे सरपंच राधेशाम झोळे, माजी पं.स.सदस्य प्रमोद पाऊलझगडे, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर बोरकर उपस्थित होते. येथील ५० पुरुष, महिला शेतकऱ्यांच्या समूहाने तयार केलेल्या गटाची सेंद्रीय शेती प्रकल्पासाठी निवड केली. ५० शेतकऱ्यांच्या गटास प्रशिक्षण देण्यासाठी कुसन झोळे यांच्या बांध्यावर मार्गदर्शन करण्यात आले. (वार्ताहर)