शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

उत्तरपत्रिका जतन करुन ठेवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

केशोरी : दरवर्षी राज्य परीक्षा मंडळ दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी-मार्च या महिन्यात घेत असतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने लांबणीवर ...

केशोरी : दरवर्षी राज्य परीक्षा मंडळ दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी-मार्च या महिन्यात घेत असतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने लांबणीवर गेल्यामुळे केंद्र शाळांना प्राप्त झालेल्या कोऱ्या उत्तरपत्रिका कस्टडीत जतन वजा सांभाळून ठेवण्याची जबाबदारी केंद्र शाळांवर देण्यात आल्याचे आदेश दि.१६ रोजी विभागीय सचिव माधुरी सावरकर यांनी जारी केले आहे.

बारावीची परीक्षा २३ एप्रिल आणि दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार वेळापत्रक सुध्दा जाहीर करण्यात आले होते. परंतु राज्यावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सदर परीक्षा पुढे ढकलून जूनमध्ये घेणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. त्या आधी एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर केल्यामुळे नागपूर विभागीय मंडळाने गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथे प्रतिनिधी पाठवून केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करुन टाकले आहे. त्या पाठोपाठ केंद्र शाळांना कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्रॉफ, मॅप, होलोक्राप्ट, स्टिकर, सिटिंग प्लॅन, एबी लिस्ट, विषयनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका इत्यादी साहित्याचे वाटप करुन विभागीय मंडळ मोकळे झाले आहे. पुढील संभाव्य परीक्षा माहे मे, जून २०२१ मध्ये होणार असल्याने आता हे साहित्य केंद्र संचालकांनी स्वत:च्या कस्टडीत जपून ठेवावे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत संबंधित उपकेद्रांना साहित्याचे वाटप करु नये. तूर्त आपले परीक्षणातील कपाटात सिलबंद करुन ठेवावे सदर साहित्याचा दुरुपयोग व गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी (दि.१६) रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

....

केंद्र संचालकांची वाढली धाकधूक

यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्राची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यामुळे अनेक केंद्र संचालकांची धाकधूक वाढली आहे. हे मात्र निश्चित एकीकडे कोरोनाचे नियम पाळून परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था आणि उपकेंद्र संचालकांना परीक्षा संचालनासंबंधी आवश्यक सूचना देणे यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.