शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयातून पाणी सोडण्याचे आदेश निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:49 IST

जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या स्थाथी समितीत ठेवला होता. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईग्रस्त गावांना होणार मदत : तीन जलाशयातून सोडणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या स्थाथी समितीत ठेवला होता. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणी टंचाइर् निवारणार्थ उपाय योजना करण्यात प्रशासनाला यावर्षी पूर्णपणे अपयश आले. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला.परिणामी मार्च महिन्यात तलाव, विहिरी बोड्या आणि बोअरवेलनी तळ गाठण्यास सुरूवात केली. तर सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा सध्या स्थितीत केवळ १२ टक्केच पाणी साठा आहे. याचा भूजल पातळीवर परिणाम झाल्याने शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत मे महिन्यापर्यंत वेळ मारुन नेली. परिणामी जिल्हावासीयांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करण्याची पाळी आली आहे. जि.प.च्या १८ मे रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत गंगाधर परशुरामकर यांनी जलाशयात काही प्रमाणात पाणी साठा शिल्लक असून तो सोडल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. याला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सुध्दा एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी २१ मे रोजी जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार चुलबंद जलाशयाचे पाणी म्हसवाणी, घोटी, बोथली, डव्वा, घाटबोरी-तेली १ दसलक्ष घनमीटर तर सिरपूर जलाशयाचे पाणी मकरधोकडा, शिलापूर, पद्मपूर, फुक्कीमेटा, धारणी या गावांसाठी २ दसलक्ष घनमीटर, ओवारा मध्यप्रकल्पाचे पाणी रामाटोला, माळीटोला, वळद, कंटगटोला, कवडी, पानगाव, येरमडा या गावांसाठी १ दसलक्ष घनमीटर आणि पुजारीटोला धरणाचे पाणी कासा, बिरसोला, काटी या गावांकरिता ०.७५ दसलक्ष घन मिटर पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. या मुळे या परिसरातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जलाशयातून पाणी सोडण्यात यावे यासाठी परशुरामकर यांनी मागील तीन दिवसांपासून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.